आशाताई बच्छाव
३,००० अंगणवाडी ताईंना मिळणार स्मार्टफोन; ५१ दिवसांच्या संपानंतर अंगणवाडीतील किलबिलाट
मोहन चव्हाण
ब्युरो चिफ बीड जिल्हा
बीड दि:१० विविध मागणीसाठी अंगणवाडीताईंनी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील अंगणवाडी ओस पडल्या. तब्बल ५१ दिवस चाललेल्या संपामुळे राज्य शासनाने अंगणवाडीताईंच्या काही मागण्या मान्य केल्याचे शाश्वती केले. त्यामुळे हा संप मागे घेण्यात आला असून बीड जिल्ह्यातला अंगणवाडीत किलबिलाट निर्माण होऊन जिल्ह्यात ०३ हजारावर अंगणवाडीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात तब्बल ५१ दिवस चाललेल्या ताईंसह ८४ पर्यवेक्षकांना स्मार्टफोन मिळणार आहे. त्यामुळे ऑनलाईन चे कामे करण्यास अंगणवाडी ताईंना सुलभ होणार आहे. अंगणवाडी ताईंना २०१८-२०१९ मध्ये पोषण आहार कार्यक्रमांतर्गत पोषण ट्रॅकर ॲपद्वारे लाभार्थी यादी, त्यांचे वजन, हजेरी उंची स्तनदा माता, गर्भवती मातांची माहिती पोषण आहाराचे वाटप आदी माहिती नोंदी करण्यासाठी शासनाकडून मोबाईल देण्यात आले होते. परंतु मोबाईलच्या तांत्रिक अडचणींच्या तक्रारी वाढल्या अंगणवाडी ताईंसाठी डोके दुखी ठरु लागल्या होत्या. त्यामुळे अंगणवाडी सेविकांनी शासनाला मोबाईल परत करून शासनाला विविध मागणी दि:०४ डिसेंबर २०२३ पासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. तब्बल ५१ दिवस चाललेल्या संपाची शासनाने दखल घेऊन अंगणवाडी ताईंच्या काही मागण्या मान्य केल्या. त्यानुसार हा संप मागे घेण्यात आला असून आता अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल कधी मिळणार ? याची उत्सुकता लागलेली आहे. बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागात २८८६ तर शहरी भागात २०४ अंगणवाड्या आहेत. अशा एकूण ०३ हजार ९० अंगणवाडी सेविकांना व ८४ पर्यवेक्षिकांना स्मार्ट मोबाइल फोन जानेवारीत शासनाने घेतल्याने निर्णयानुसार मिळणार आहेत. त्यामुळे ऑनलाईन चे कामे करण्यात सुलभ होणार आहे.