आशाताई बच्छाव
संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार टोम्पे यांची बदली रद्द करावी ! स्वस्तधान्य दुकाणदार संघटना, संग्रामपूर यांची मागणी
ज्ञानेश्वर पाटील दांदळे ब्यूरो चीफ बुलढाणा
संग्रामपुरचे कर्तव्यदक्ष तहसिलदार योगेश्वर टोम्पे यांची बदली करण्यात आलेली आहे असे समजताच संग्रामपूर तालुक्यातील विविध संघटनेसह सामान्य नागरिक यांनी शासन दरबारी निवेदन केले की संग्रामपूरचे कर्तव्यदक्ष तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्या आलेल्या बदलीचा आदेश रद्द करण्यात यावा कारण त्यांनी संग्रामपूर येथील तहसिल कार्यालयातील कामकाज योग्य रितीने सांभाळलेले असुन ते अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन संग्रामपूर तालुक्याला लाभलेले अधिकारी आहेत. सोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पिक विमा योजना अतिवृष्टीची मदत दुष्काळ निधी बाबत असे अनेक त्यांचे कार्य कमी दिवसात अतिषय उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहे. आणि त्यांचे ईतर कार्यालयीन कामकाज सुद्धा सुरळीत पार ‘ पाडलेले आहे. आता संग्रामपूर तालुक्यातील महसुल विभाग, पुरवठा विभाग तसेच इतर विभागाची कामे सुरळीत झालेली आहेत. विशेष म्हणजे याआधी कित्येक प्रकरण धुळखात पडून होते सामान्य नागरिकांना कधीच न्याय मिळत नव्हता असे असताना फक्त सहा ते सात महिने संग्रामपूर तहसील ला तहसीलदार म्हणून योगेश्वर टोम्पे यांना येऊन झाले परंतु त्यांनी कमी वेळेत जास्त काम करून दाखविले अशा परिस्थीती जर तहसिलदार टोम्पे साहेबांची बदली करण्यात आली तर हि सुरळीत केलेली कामे पुन्हा एकदा विस्कळीत होण्याची भिती आहे. तरी शासनाने आमच्या या निवेदनाचा विचार करुन योगेश्वर टोंपे, तहसिलदार संग्रामपूर यांची बदली रद्द करुण त्यांना याच ठिकाणी रुजु करण्याबाबत कार्यवाही करावी असे निवेदन स्वस्त धान्य दुकानदार संघटनेकडून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून इतरही संघटनेच्या तसेच सामान्य नागरिकांच्या वतीने सुद्धा तहसीलदार योगेश्वर टोम्पे हेच संग्रामपूर येथे असावे अशी मागणी जोर धरत आहे.