आशाताई बच्छाव
पुणे/मुळशी,(सुर्यकांत भोर प्रतिनिधी )- मारूंजी येथील सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत जयश्री रामदास कवडे यांची बहुमताने निवड करण्यात आली सरपंच ईश्वर भाऊ बुचडे यांनी सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर या पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यात आली. या निवडणुकीत एकूण तीन अर्ज आले होते विमल तानाजी लांडे जयश्री कवडे प्रीती जगताप यात विमल लांडे यांनी अर्ज माघारी घेतल्यामुळे सरळ लढत ही प्रीती जगताप व जयश्री कवडे यांच्यात झाली यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात आले यामध्ये जयश्री कवडे ८/५ या फरकाने विजय मिळवला निवडणूक अधिकारी म्हणून थेरगाव मंडळ अधिकारी श्री विष्णू भोसले साहेब व तलाठी भाऊसाहेब सागर शेलार यांनी या निवडणुकीचे काम पाहिले