आशाताई बच्छाव
पारंपारिक कारागिरांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घ्यावा- सतीश घाटगे
——–
अंबड -घनसावंगी जालना. ,( दिलीप बोंडे):- खेड्या- पाड्यातील पारंपारिक कारागिरांना बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना सुरु केली आहे. अठरा प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील कारागिरांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजप नेते सतीश घाटगे यांनी केले आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील कुंभार, लोहार, चर्मकार, नाभिक, शिंपी, धोबी, सुतार, चावी बनवणारे, मासेमारीचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे, गवंडी आदी पारंपारिक कारागीरांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे. पारंपारिक व्यासाय करणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याला ५ ते १५ दिवस कालावधीचे व्यवसाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण काळात लाभार्थीला ५०० रुपये प्रती दिवस प्रमाणे विद्यावेतनही दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर साहित्य खरेदीसाठी १५ हजाराचे अनुदान व विश्वकर्मा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना व्यवसाय उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपायाचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभासाठी जवळच्या सीएससी सेंटरवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून ऑनलाईन अर्ज करावा. असे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.