Home जालना पारंपारिक कारागिरांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घ्यावा-  सतीश घाटगे  

पारंपारिक कारागिरांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घ्यावा-  सतीश घाटगे  

35
0

आशाताई बच्छाव

IMG_20231214_063836.jpg

पारंपारिक कारागिरांनी ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजनेचा लाभ घ्यावा-  सतीश घाटगे
——–
अंबड -घनसावंगी जालना. ,( दिलीप बोंडे):- खेड्या- पाड्यातील पारंपारिक कारागिरांना बळ देण्यासाठी  केंद्र  सरकारने ‘प्रधानमंत्री विश्वकर्मा’ योजना सुरु केली आहे. अठरा प्रकारच्या  पारंपारिक कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागातील कारागिरांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन भाजप नेते सतीश घाटगे यांनी केले आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील कुंभार, लोहार, चर्मकार, नाभिक, शिंपी, धोबी, सुतार, चावी बनवणारे, मासेमारीचे जाळे बनवणारे, खेळणी बनवणारे, गवंडी आदी पारंपारिक कारागीरांसाठी केंद्र सरकारने ही योजना सुरु केली आहे.  पारंपारिक व्यासाय करणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याला ५ ते १५ दिवस कालावधीचे व्यवसाय  प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षण  काळात लाभार्थीला ५०० रुपये प्रती दिवस प्रमाणे विद्यावेतनही दिले जाणार आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर  साहित्य खरेदीसाठी  १५ हजाराचे अनुदान व विश्वकर्मा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या व्यक्तींना  व्यवसाय उभारण्यासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख तर दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपायाचे कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून मदत करण्यात येणार आहे.  या योजनेचा लाभासाठी  जवळच्या सीएससी सेंटरवर किंवा ग्रामपंचायत कार्यालयातून ऑनलाईन  अर्ज करावा. असे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.

Previous article2024 च्या निवडणुकीत आंबेडकरी घराण्याला सहकार्य करण्याचे आवाहन-सरसेनानी आनंदराज आंबेडकर
Next articleमेडिकल कॉलेजसाठी निश्चित केलेल्या जागेचा तिढा तात्काळ मार्गी लावा – आ.कैलास गोरंटयाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here