आशाताई बच्छाव
सर्पमित्र व वन्यजिव रक्षक शासकीय ओळखत्र आणि विमा सुरक्षा द्या; निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेची आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे मागणी
सर्पमित्रांच्या मागण्यासाठी अधिवेशनात आवाज उठविणार – आमदार कैलास गोरंट्याल यांचे आश्वासन. जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)-
महाराष्ट्र राज्यात सर्पमित्र आणि वन्यजिव रक्षकांना शासनामार्फत अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे व त्यांचा किमान 50 लाख रुपयाचा विमा शासनाने काढावा या व इतर मागण्या जालना येथील निसर्गरक्षक प्राणीमित्र संघटनेच्या वतीने आमदार कैलास गोरंट्याल यांच्याकडे करण्यात आल्यात.
महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात कुठेही साप निघाल्यास सर्पमित्रांना बोलविले जाते. मनुष्यबळाच्या अभावी वन विभागाचे अधिकारी सापाचे रेस्क्यु करीत नाहीत. त्यामुळे सर्पमित्र धावून जातो. स्वतःचा जिव धोक्यात घालून सर्पमित्र सापाचे रेस्क्यु करीत असतो. परंतु, अचानक अनावधानाने एखादा दंश झाला तर सर्पमित्राचा अकाली मृत्यु होतो. त्यामुळे सर्पमित्राचा परिवार उघड्यावर येतो. अशा परिस्थीतीत सर्पमित्रांच्या परिवारापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे शासनाने सर्पमित्रांचा विमा उतरविणे आवश्यक आहे. तसचे रात्री-अपरात्री साप निघाल्यास सर्पमित्रांना घराबाहेर जावे लागते. अशा वेळी पोलीसांकडून त्यांच्यावर कारवाई केली जाते. सिग्नल अथवा ट्रॅफीक मधून सर्पमित्रांना तातडीने सापाचे रेस्क्यु करण्यासाठी जावे लागते. अशा वेळी पोलीस कारवाई होते. त्यामुळे सर्पमित्रांना शासकीय ओळखपत्र देऊन त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात यावा व रुग्णवाहीकेसारखी त्यांना सुट देण्यात यावी. तसेच त्यांचा आपत्कालीन सेवेत समावेश करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आलीय.