आशाताई बच्छाव
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडातला घास हिरावला शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी- राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )28 नोव्हेंबर 2023 ला भंडारा जिल्ह्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाचे त्याचप्रमाणे शेतात उभ्या असलेल्या धानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असल्यामुळे शेतकरी हवालदीप झाला असून शेतकऱ्यांच्या तोंडातला घास अवकाळी पावसाने हिरावला असून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांचे धान पिकाचे सर्वे करून त्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी व शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय ओबीसी बहुजन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष संजीव भांबोरे यांनी केलेली आहे.