आशाताई बच्छाव
सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी
——–
गावागावात शेतकऱ्यांचा जल्लोष : देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार
——-
घनसावंगी/अंबड/जालना दिलीप बोंडे: तहानलेल्या मराठवाड्याला उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार जायकवाडीत शनिवारी सकाळी पाणी दाखल झाले. पाणी दाखल झाल्यानंतर अंबड – घनसावंगी तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. पाणी सोडल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व न्यायालयीन लढ्याबद्दल सतीश घाटगे यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले. शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून फटाके फोडत पाणी सोडल्याचा जल्लोष साजरा केला.
मराठवाड्याचे पाणी अडविण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी दाखल केलेल्या याचीकेविरोधात समृद्धी साखर कारखान्यामार्फत सतीश घाटगे यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आले. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचे आदेश कायम ठेऊन सरकारला जायकवाडीत पाणी सोडण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सतीश घाटगे यांनी जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश संबधित अधिकाऱ्यांना देण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे २१ नोव्हेंबर रोजी केली होती. देवेंद्र फडणवीस यांनी सतीश घाटगे यांच्या विनंतीची तातडीने दखल घेऊन मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार नाशिकच्या दारणा धरण समूहातून जायकवाडी धरणामध्ये पाणी सोडण्याचे आदेश शुक्रवारी दिले. त्याची तातडीने अंमलबजावणी झाली असून शनिवारी सकाळी जायकवाडी धरणात पाणी दाखल झाले. जायकवाडीत पाणी येताच घनसावंगी – अंबड तालुक्यातील कुंभार पिंपळगाव, येथे जल्लोष साजरा करण्यात आला