आशाताई बच्छाव
देवाच्या नामाने व संताच्या अमृत वचनामुळे जीवन सफल होते- ह.भ.प. योगीराज महाराज लोखंडे
जालना/दिलीप बोंडे
सुख – समाधान ही अंतःकरणाची अवस्था आहे त्यामुळे अष्ट साप्तीक भाव, दया, क्षमा, शांती वैराग्य निर्माण होतात. देवाच्या नामामुळे व संताच्या अमृत वचनामुळे सुख व आनंद प्राप्त होते, असे प्रतिपादन अ.भा. वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व हरि किर्तनकार योगीराज महाराज लोखंडे यांनी केले.
जालना येथील गोपिकिशननगर येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात आयोजित जगतगुरू तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्यामध्ये योगीराज महाराज लोखंडे निरूपन करीत होते.
यावेळी भाजपाचे जालना शहराध्यक्ष राजेश राऊत, संजय देठे, प्रतिष्ठीत व्यापारी अरूण अग्रवाल, संजय भरतीया, दिनेशकुमार भारूका, राजेंद्र भारूका, श्रीकृष्ण मद्लवार, खुशालसिंह ठाकुर, अप्पासाहेब चव्हाण, राजेंद्र भक्कड, कैलासचंद्र भनानी, जगदीश सिंधी सराफा,आर.आर. खडके, अंकुशराव राऊत, महावीर ढक्का , शंकर महाराज मोरे, शुभम् महाराज आळंदीकर, रमेश शिंदे , हरिओेेम लोेखंडे, विठोेबा लोखंडे आदिंची उपस्थिती होती.