आशाताई बच्छाव
जो समाज पुरुषांना महापुरुषांची आठवण करतो तो समाज पुढे जातो:- पोलीस अधीक्षक लोहित मताने
संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी) डॉ बाबासाहेब आंबेडकरांना नेहमी त्यांच्या कार्यात रमाबाई आंबेडकर चे फार मोठे योगदान आहे आज इंटरनेट टेक्नॉलॉजी युग आहे या युगातही आपल्याला इंटरनेटच्या माध्यमातून आपल्याला समाजसुधारकांचे विचार आत्मसात करता येतात समाज सुधारण्याकरता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे संघर्ष केला पाहिजे त्याग केला पाहिजे डॉबाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजासाठी व देशासाठी जो त्या केला तो स्मरणात ठेवल्यासारखा आहे त्यामुळे आपण त्याग करायला सर्व शिकले पाहिजे आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या मागे रमाई होत्या त्यामुळे रमाईचे फार मोठे योगदान आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्म परिवर्तन केले सर्व ठिकाणी जातीव्यवस्था आहे ते मोडून काढण्यासाठी प्रयन केले त्यासाठी त्यांनी ग्रंथ सुद्धा लिहिला त्याचप्रमाणे सरकारने सुद्धा इंटरकास्ट मॅरेज करणे वाल्यांना जास्तीत जास्त पैसे दिले पाहिजे जास्तीत जास्त सवलती दिल्या पाहिजे जो समाज महापुरुषांची आठवण करते तो समाज पुढे जातो पण जे विसरतात तो समाज मागे जातात असे मत पोलिस अधीक्षक लोहित मतांनी यांनी एकोडी येथील रमाबाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना आपले मत प्रगट केले याप्रसंगी अध्यक्षस्थानी आंबेडकर चळवळीचे नेते परमानंद मेश्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे, पोलिस निरिक्षक राजेश थोरात, मनोहर कोचे,सुधीर जांभुळकर, सेवानिवृत्त मुख्याध्यापक किशोर बनसोड, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डी जी रंगारी, रमेश खेडीकर, मेघाताई हुमे, सरपंच संजय खोब्रागडे, सतीश समरीत, वैभव खोब्रागडे, ग्रामसेवक खंडाळे, माजी पोलीस हवालदार टिकाराम लेंडे ,मुख्याध्यापक विलास लांडे , गायक मनोज कोटांगले ,भावेश कोटागले, एकनाथ कोटागले इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला विविध मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा दाखविण्यात आले त्यांनी पूर्ण त्या प्रसंगी यांनी मदत केली समाजाला मदत केली त्या सर्वांच्या स्मृतीचिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी आंबेडकर चळवळीचे नेते परमानंद मेश्राम यांनी सुद्धा डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी एवढे दिले एवढे दिले की ते आपण मरेपर्यंत परतफेड करू शकत नाही असे असताना सुद्धा कार्यक्रमांमध्ये मात्र आपला समाज फार मोठा डोळे झाक पना करतो बाबासाहेबांचा विचार आचरणात आणत नाही कार्यक्रमांमध्ये उपस्थिती बरोबर राहत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली आणि बाबासाहेबांचे विचार आत्मसात करण्याकरिता पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त केले जिल्हा परिषद सदस्य माहेश्वरी नेवारे यांनी सांगितले की
डॉ बाबासाहेबांनी शिका संघटित व्हा संघर्ष करा हा नारा दिला त्यामुळे सर्व आणि घटनेच्या माध्यमातून सर्वांना अधिकार बहाल केले याचा सर्व समाजाला फायदा झाला त्यामुळे त्यांनी स्वतःच्या ग्रंथालय उभा केला तसेच छोट्या स्वरूपाचा ग्रंथालय ग्रंथालय सर्वांनी आपल्या घरात उभं करावं व बाबासाहेबांचा विचार आत्मसात करावा असे मत मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन मनोज कोटांगले यांनी केले तर आभार भावेश कोटागले यांनी मानले
कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सुमेध बुद्ध विहाराचे अध्यक्ष मिथुन जांभुळकर ,उपाध्यक्ष सूर्यकांत कोठांगले ,कार्तिक मेश्राम ,शेषराव मेश्राम ,विनोद कोटांगले ,बिंदू मेश्राम, सोनाली कोटांगले सुरेखा मेश्राम ,कुसुम कोटांगले,लीना जांभुळकर वैशाली मेश्राम, तेजस्विनी कोटांगले, भारती कोटांगले, सुजाता , आम्रपाली बोरकर ,शालू कोटांगले ,मोहिनी कोटांगले, सुषमा जांभुळकर , सुखेसणी जांभुळकर यशोधरा कोटांगले, सविता जांभुळकर ,रेखा राऊत, मीनाक्षी मेश्रामाच, निर्मला कोटांगले , अर्चना जांभूळकर, संगीता मेश्राम ,हिना कोटांगले, प्रमिला मेश्राम , व इतर भरपूर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते सायंकाळी कव्वालीच्या कार्यक्रम घेण्यात आला तर कार्यक्रमांमध्ये सुद्धा मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते आणि संगीताचा आस्वाद घेतला हे विशेष