आशाताई बच्छाव
पत्रकार लक्ष्मण सोळुंके हल्लाप्रकरणातील आरोपींना अटक करण्याची मागणी
शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करा; जिल्ह्यातील पत्रकारांसह शेतकरी संघटनांही आक्रमक
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ) – जिल्ह्यातील साम टिव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जिल्ह्याभरातून होत आहे. घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत जिल्ह्यातील पत्रकारांसह शेतकरी संघटनांही आक्रमक झाल्या आहेत. अंबड, भोकरदनसह विविध भागातून पोलीस अधिक्षक, पोलीस निरीक्षक, कृषि अधिकारी यांना निवेदने देण्यात येत आहे.
या संदर्भात देण्यात येणार्या निवेदनात म्हटले आहे की, भोकरदन तालुक्यातील कोलते पिंपळगाव या गावातील शेतकरी यांच्याकडून युनिवर्सल सोमपो जनरल विमा कंपनीचे प्रतिनिधी ऑनलाईन केलेल्या तक्रारीच्या कागदपत्रांची पडताळणी व पिकांची पाहणी करण्यासाठी आलेले असतांना नुकसानग्रस्त शेतकर्यांकडून पैशाची मागणी करीत असल्याची माहिती साम टिव्हीचे लक्ष्मण सोळुंके यांना काही शेतकर्यांनी दिली. त्यावरुन खात्री करण्यासाठी व वृत्तांकनासाठी ते त्या ठिकाणी गेले असता तेथील गावगुुंडांनी वार्तांकन करण्यास मज्जाव करून तु लय पत्रकार झालाय का असे म्हणून शिवीगाळ करून कॉलर धरून धक्काबुक्की केली व तु जास्त माजला आहे, तुला पाहुन घेऊ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही, आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यासह घटनेचा निषेध करण्यात येत आहे. यासह शेतकर्यांची आर्थिक लुट करणार्या वीमा प्रतिनिधींवरही गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.