Home Breaking News बस आगारप्रमुख साकोली यांना विध्यार्थ्यांच्या समस्यांचे निवेदन

बस आगारप्रमुख साकोली यांना विध्यार्थ्यांच्या समस्यांचे निवेदन

28
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20231006-WA0053.jpg

बस आगारप्रमुख साकोली यांना विध्यार्थ्यांच्या समस्यांचे निवेदन

युवा मराठा न्युज नेटवर्क महाराष्ट्र  संजीव भांबोरे
(भंडारा ब्युरो जिल्हा ) साकोली तहसील मधील एकोडी गाव हे परिसरातील मुख्य गाव असून शैक्षणिक शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. एकोडी इथे जिल्हा परिषद हायस्कूल, कामाई करंजेकर विद्यालय, तथा बोरगाव फाटा या ठिकाणी निर्धन पाटील वाघाये विद्यालय आहे.
या ठिकाणी तुमसर मार्गे येणाऱ्या बस मध्ये सोनेगाव, ऊसगाव, मक्कीटोला, चांदोरी , सुंदरटोली पळसपाणी येथील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी बस ने येणे जाणे करतात. विद्यार्थ्यांच्या शाळेची वेळ ही सकाळी 10.30 ला असते व रोज विद्यार्थी येणे जाणे करतात.

परंतु मागील 20 दिवसापासून साकोली तुमसर सकाळी 7 वाजताची बस बंद झाल्याने विध्यार्थी हे सकाळी 10.30 ला विद्यालयात पोहचू शकत नाही त्यामुळे त्यांच्या सुरवातीच्या दोन तासिका त्यांना उपस्थित राहता येत नाही.
तसेच शनिवार ला सकाळी शाळा असल्याने सुट्टी ही 11 वाजता होते परंतु सकाळी 10.30 नंतर सरळ 1 ते 2 च्या मधात बस आल्याने विद्यार्थी दोन वाजे पर्यत बस थांब्यावर बसून राहतात.
ही विद्यार्थ्यांची तसेच विद्यालयाच्या शिक्षकांची अडचण ऐकून ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले यांनी थेट साकोली आगार व्यवस्थापक सचिन आगरकर यांना भेटून सविस्तर माहिती दिली व सकाळी 7 वाजता साकोली तुमसर गाडी सोडण्यात यावी या संबंधाने निवेदन दिले.
निवेदन देताना ग्रामपंचायत सदस्य तथा जिल्हा अध्यक्ष प्रतिभावंत प्रबोधनकार कला साहित्य संघटना भावेश कोटांगले, डी. जी . रंगारी पत्रकार, गोपीनाथ मेश्राम, जयंत बोरकर उपस्थित होते.

Previous articleखासदार सांस्कृतिक महोत्सवाची दिमाखात होणार सांगता
Next articleपान टपरी वाले युवकांनी वाचविले दुचाकी चालकाचे प्राण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here