आशाताई बच्छाव
खळबळ उडून देणारी सर्वात मोठी बातमी कळव्यानंतर नांदेड मध्ये सरकारी रुग्णालयामध्ये 24 तासात 24 रुग्ण दगावल्याने पुन्हा महाराष्ट्र हादरला नांदेड- (संजय कोकेंवार ब्युरो चीफ) डॉ.शंकरराव चव्हाण यांच्या नावाने मोठ्या उद्देशाने विष्णुपुरी येथे सुरू करण्यात आलेल्या शासकीय रुग्णालयात 24 जणांचा मृत्यू झाल्याची घटना ही दुर्दैवी आहे.ही घटना कमी औषधाच्या तुटवड्यामुळे झाल्याचे उघड झाले आहे.या घटनेची वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत चौकशी होईलही परंतु या ठिकाणी सहा जिल्ह्यातून दररोज रुग्ण दाखल होणाऱ्या अनेक गंभीर रुग्णांची संख्या पाहता येथे पुरेसा औषधी साठा व तज्ञ डॉक्टरांच्या सक्षम टीमसह दर्जा आणि सुविधाची वाढ होणे आवश्यक आहे. भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची याबाबत वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर यांच्याशी चर्चा केली असून त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथून तज्ञ डॉक्टरांची टीम पाठविली आहे.अधिष्ठता डॉ. एस.आर.वाकोडे यांच्याकडून माहिती घेतली असता,त्यांनी असे सांगितले की,या रुग्णालयात दररोज पाच ते सहा रुग्णाचा मृत्यू वेगवेगळ्या कारणाने होत असतात.गंभीर रुग्ण रुग्णालयात दाखल होताना अगोदरच अत्यावश्य असतात.त्यामुळे त्यांच्या आजारावरील धोका वाढलेला असतो.अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या उपलब्ध मनुष्यबळाद्वारे जास्तीत जास्त चांगले उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो.मागील चार ते पाच दिवसापासून सलग सुट्टी असल्यामुळे नांदेड आणि आसपासच्या ठिकाणाचे डॉक्टर बाहेरगावी गेले आहेत.त्यामुळे खाजगी रुग्णालयामध्ये अति गंभीर रुग्णांना दाखल होता आले नाही.मागील तीन दिवसात जे जास्त संख्येने मृत्यू झाले,त्यांच्या आजाराची कारणे वेगवेगळी आहेत.डॉक्टरांच्या हलगर्जी पणामुळे अंथवा औषधीच्या कमतरतेमुळे कोणताही मृत्यू झालेला नाही.अशी शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.आर.वाकोडे यांनी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना सांगितले. पण या घटनेने परत एकदा नांदेड जिल्हा व महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे.