आशाताई बच्छाव
मणिपुर हिंसाचार प्रकरणी वंचितचे सोमवारी निदर्शने
पदाधिकार्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे-अकबर ईनामदार
जालना/दिलीप बोंडे ब्युरो चीफ – संपुर्ण देशाला मान शरमेने खाली लावणारी घटना मणिपुर येथील आदिवासी महीला सोबत घडली असुन या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणिय बाळासाहेब आंबेडकर ,अंजलीताई आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर यांच्या आदेशान्वयेसोमवार दि.३१ जुलै रोजी दुपारी २.०० वा जालना जिल्हाधिकारी कार्यालया समोर वंचित बहुजन आघाडी जालना जिल्ह्याच्या वतीने तिव्र निदेर्शने करण्यात येणार आहेत, या निर्दर्शने कार्यक्रमात जालना जिल्ह्यातील मुस्लिम बांधव,व वंचित बहुजन आघाडीच्या आजी माजी पदाधिकारी व जेष्ठ नेत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे अवाहन वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा उपाध्यक्ष अकबर भाई ईनामदार यांनी केलंय.