Home राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणामुळे सामान्यांना वैताग

महाराष्ट्राच्या राजकारणामुळे सामान्यांना वैताग

363

आशाताई बच्छाव

Screenshot_20230703-100429_WhatsApp.jpg

लातूर,(पवन कदम ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
दिनांक -02 / 07 /2023
रोजी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.राज्यातील नवीन मतदारांना आज च्या विषयावर चर्चा केली तर त्यांना काही प्रश्न पडले असतील. मतदान कोणाला केलं आणि कोण सत्तेवर वर आल असा प्रश्नही आज मतदार राजाला पडला असेल.
आजची ही परिस्थिती बघता निवडणूक आयोगाने मतदान केल्यावर हाताला शाई न लावता चुना लावला पाहिजे , कारण महाराष्ट्राची राजकीय स्थिती बिघडली आहे.. सगळेच सत्तेचे विलासी झाल्या मुळे मतदान कोणालाही करू सगळे एकच माळेचे मणी अशी व्यथा राज्यात आहे. महाराष्ट्र एकपक्षीय राजकारनाकडे जात आहे का असा प्रश्न युवा पिढीला व नवीन मतदारांना पडला असेल. भविष्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्याला युवा पिढीने आजच्या राजकीय स्थितीचा काय बोध घ्यावा ?
खरच राज्याचं राजकारण येवढं खराब झालं आहे की नवीन पिढीला प्रेरणा देणारा राजकारणी उरलाच नाही ??
आता मतदान कोणाला करावं हा नवीन मतदारांपुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला असेल.

Previous articleअमरावती जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षात कोणी शरद पवार साहेब सोबत तर कोणी अजितदादा पवार सोबत राजकीय अनेकांना धक्का.
Next articleलोह्यात अजित पवार यांच्या निवडीचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून जल्लोष
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.