आशाताई बच्छाव
लातूर,(पवन कदम ब्युरो चीफ युवा मराठा न्युज)
दिनांक -02 / 07 /2023
रोजी झालेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील गोंधळ बघून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील.राज्यातील नवीन मतदारांना आज च्या विषयावर चर्चा केली तर त्यांना काही प्रश्न पडले असतील. मतदान कोणाला केलं आणि कोण सत्तेवर वर आल असा प्रश्नही आज मतदार राजाला पडला असेल.
आजची ही परिस्थिती बघता निवडणूक आयोगाने मतदान केल्यावर हाताला शाई न लावता चुना लावला पाहिजे , कारण महाराष्ट्राची राजकीय स्थिती बिघडली आहे.. सगळेच सत्तेचे विलासी झाल्या मुळे मतदान कोणालाही करू सगळे एकच माळेचे मणी अशी व्यथा राज्यात आहे. महाराष्ट्र एकपक्षीय राजकारनाकडे जात आहे का असा प्रश्न युवा पिढीला व नवीन मतदारांना पडला असेल. भविष्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्याला युवा पिढीने आजच्या राजकीय स्थितीचा काय बोध घ्यावा ?
खरच राज्याचं राजकारण येवढं खराब झालं आहे की नवीन पिढीला प्रेरणा देणारा राजकारणी उरलाच नाही ??
आता मतदान कोणाला करावं हा नवीन मतदारांपुढे सर्वात मोठा प्रश्न उभा राहिला असेल.