आशाताई बच्छाव
राजकीय श्रेयवादात रखडून पडलेल्या जालन्यातील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाची मान्यता
—————————————-
आ.कैलास गोरंटयाल संघर्षमय प्रयत्नांना अखेर यश
—————————————-
जालना(दिलीप बोंडे ब्युरो चीफ)जालना येथील वैद्यकीय महाविद्यालयास अखेर राज्य शासनाने आज बुधवारी आर्थिक तरतुदीसह मान्यता दिली आहे.जालन्याचे आ.कैलास गोरंटयाल यांनी या मागणीसाठी दिलेल्या लढ्याला अखेर यश मिळाल्याने जालना शहरासह जिल्ह्यातील जनतेकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झालेच पाहिजे अशी आग्रही मागणी आ.कैलास गोरंटयाल यांनी सातत्याने शासन स्तरावर केली आहे.या मागणीची दखल घेऊन राज्यातील तत्कालीन महाविकास आघाडी सरकार मधील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी जालना येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी जागेची पाहणी करण्यासाठी तज्ञ वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक जालना येथे पाठवले होते.या पथकातील अधिकाऱ्यांनी काही जागांची पाहणी करून तसा अहवाल सादर केला होता.महत्वाची बाब म्हणजे त्यानंतर स्वतः अमित देशमुख यांनीही जालना येथे येऊन प्रस्तावित जागेची पाहणी करून वैद्यकीय महाविद्यालयासाठी मंजुरी देण्याचा प्रस्ताव पाठवल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महाविद्यालयास मान्यता दिली होती.मात्र,राज्यात सत्तांतर होऊन शिंदे – फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर जालना येथील मंजूर असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात कोणतीच आर्थिक तरतूद करण्यात आली नव्हती.त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आ.कैलास गोरंटयाल यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पायऱ्यांवर बसून लक्षवेधी धरणे आंदोलन करत या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.