आशाताई बच्छाव
वान नदीपात्रातून होणारा अवैध रेती उपसा बंद करा वंचित युवा आघाडीची मागणी
कार्यवाही न झाल्यास आमरण ऊपोषणाचा ईशारा
स्वप्निल देशमुख ब्यूरो चीफ बुलढाणा
संग्रामपुर :- दि 23/6/23 रोजी वंचित बहुजन युवा आघाडी संग्रामपूर तालुका अध्यक्ष वान नदीपात्रा जवळ राहणरे व शेती असणारे शेतकरी यांच्या वतिने तहसीलदार संग्रामपूर यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये असे नमूद केले आहे की गेल्या काही महिन्यांपासून वडगाव वान ते पातुर्डा वान नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असुन नदीपात्राच्या काठी असणारी शेती व गावे यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गावाकाठी सुध्दा मोठे मोठे खड्डे करुन गावात जाणारे रस्ते सुद्धा बंद केले तसेच पुढे दोन ते तीन दिवसांत शाळा सुरू होत असल्याने लहान लहान मुले शाळेत जातात आणि रेतीने भरलेली वाहने रोडने सुसाट धावतात असं असताना सुध्दा शासन याकडे दुर्लक्ष का करते हा मोठा प्रश्न निर्माण झाला असून अधिकारी व वाळु माफीया यांच्यात काही साटेलोटे आहे अशी शंका निर्माण होत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ 8 दिवसांत वाळु माफीया वर कारवाई करावी अन्यथा वान नदीपात्राच्या खड्यात आमरण उपोषण करू असा इशारा निवेदनातुन देण्यात आला. आशिष धुंदळे, सुनिल सोनोनै शत्रुग्न बाजोडे , रमेश धुंदळे , रतन बाबुळकर , राजरत्न तायडे यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.