Home Breaking News निराधारांचे रखडलेले मानधन लवकर द्या नसता जिल्हाधिकाऱ्यांना घेरावा घालणार ः नंदा पवार...

निराधारांचे रखडलेले मानधन लवकर द्या नसता जिल्हाधिकाऱ्यांना घेरावा घालणार ः नंदा पवार तहसील कार्यालय येथे महिला काँग्रेसच्या वतीने पार पडले ठिय्या आंदोलन

46
0

आंशुराज पाटिल मालेगाव कार्यालय

IMG-20230602-WA0062.jpg

निराधारांचे रखडलेले मानधन लवकर द्या नसता जिल्हाधिकाऱ्यांना घेरावा घालणार ः नंदा पवार
तहसील कार्यालय येथे महिला काँग्रेसच्या वतीने पार पडले ठिय्या आंदोलन
जालना (प्रतिनिधी) ः जालना शहर आणि तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जाचक अटी लावल्यामुळे त्यांचे मानधन रखडल्याने  शुक्रवार रोजी तहसील कार्यालय जालना येथे जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नंदाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय येथे लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले.
राज्य शासनाच्या वतीने गरीब नागरीकांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यापैकी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरूष व महिला, अंध, अपंग, अनाथ, मुले, घटस्फोटीत महिला, परितक्त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळतो. जालना शहर आणि तालुक्यातील या योजनेमार्फत मिळणारे मानधान अनेक दिवसांपासून रखडलेले होते. या योजनेचा निधी उपलब्ध झाल्यामुळे काही लाभार्थ्यांना मानधन वितरीत करण्यात आले. परंतू काही लाभार्थ्यांना जाचक अटी लावल्यामुळे त्यांचे मानधन थकल्यामुळे त्यांच्यावर उपासमारिची वेळ येवून ठेपलेली आहे. काही दिवसांपासून हे लाभार्थी तहसील कार्यालयाला खेट्या मारीत होते. परंतू संबंधीत अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यामुळे या लाभार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे लक्षात आल्यानंतर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नंदाताई पवार यांनी तहसीलदार श्रीमती छाया पवार यांना या विषयाची पुर्ण कल्पना देवून लाभार्थ्यांना त्यांचे रखडलेले मानधन वितरीत करण्यासाठी विनंती केली होती. त्यांनी देखील या बाबीकडे गंभीरतेने बघीतले नाही. त्यामुळे शुक्रवार रोजी तहसील कार्यालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केले असता तहसीलदार श्रीमती पवार यांनी क

Previous articleवनसगाव ग्रा पं च्या उपसरपंचपदी वनिताताई शिंदे निवडीचे वृत्त कळताच समर्थकांनी केला आनंदाने जल्लोष
Next articleशिवराज्याभिषेक सोहळ्या प्रसंगी ठेवण्यात आलेले नाटक तात्काळ रद्द करावे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here