Home बुलढाणा कर्तव्यदक्षक तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे संग्रामपुरकपाशीची लागवड १ जूननंतर करावी :...

कर्तव्यदक्षक तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे संग्रामपुरकपाशीची लागवड १ जूननंतर करावी : कृषी अधिकारी बनसोडे

147

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0083.jpg

कर्तव्यदक्षक तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे संग्रामपुरकपाशीची लागवड १ जूननंतर करावी : कृषी अधिकारी बनसोडे
स्वप्निल देशमुख ब्यूरो चीफ बुलढाणा
संग्रामपूर :- तालुक्यात खरीप हंगामासाठी शेतकन्यांनी पेरणीपूर्व शेतीच्या मशागतीला सुरुवात केली आहे. सद्यस्थितीत मान्सूनची पोषक परिस्थिती तयार झाली असून मान्सून अंदमानमध्ये -पोहचला आहे. हवामानाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात मान्सून आगमनास जवळपास १० जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शेतकन्यांनी १ जूननंतरच कपाशीची लागवड करण्याचे आवाहन तालुका कृपो अधिकारी अमोल बनसोडे यांनी केले आहे. खरीप हंगामात सोयाबीन आणि
कापूस या दोन पिकांची या तालुक्यात सर्वाधिक शेती केली जाते. तसेच काही शेतकरी २० मे नंतर कपाशीची लागवड करत असतात तिथे बोंड अळीचे प्रमाण सर्वाधिक पहावयास दिसून येते. यामुळे कापूस पिकावर येणान्या बोंड अळीवर नियंत्रण मिळवायचे. असेल तर शेतकन्यांनी कापसाची लागवड १ जूननंतर करावी असे अमोल बनसोडे यांनी सांगितले. कृषी विभागाच्या माध्यमातून घाऊक आणि किरकोळ बियाणे विक्रेत्यांनी १ जूनपूर्वी कापूस बियाणे विक्री केल्यास विक्रेत्यांवर सक्त कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दमदार पावसाचे आगमन झाल्यानंतरच

बियाणे व खताची टंचाई भासणार नाही

संग्रामपूर तालुक्यासाठी खरीप हंगाम २०२३ यावपी करिता बियाणे व रासायनिक खत उपलब्ध झालेले आहे. शेतकन्यांच्या मागणीप्रमाणे येत्या खरीप हंगामासाठी बीटी संकरित कापसाच्या बिजी -१ वाणासाठी प्रति पाकीट ६३५ रुपये तर बिजी २ वाणासाठी ८५३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली आहे. शेतकन्यांना वेळेवर पुरेशी बियाणे व खत उपलब्ध होणार आहे. बियाणे तसेच रासायनिक खताची टंचाई भासणार नाही. आणी बाजारात बनावट बियाणे उपलब्ध झाल्यास असे बियाणे खरेदी करू नये तसेच निर्धारित दरापेक्षा जास्त दराने बियाणे उपलब्ध झाल्यास शेतकन्यांनी तालुका कृषी अधिकारी अथवा पंचायत समितीच्या कृषी अधिकान्यांशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
कापसाची लागवड करावी, यावर्षी निश्चितच शेतकन्यांनी बोंड अळी वर नियंत्रण मिळवण्यासाठी येईल. कापूस लागवड एक जून नंतर
केल्यास त्यांना कापूस पिकातून चागले विक्रमी उत्पन्न मिळवता