Home नाशिक वारकरी मंच च्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शाखा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी...

वारकरी मंच च्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शाखा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार

93
0

आशाताई बच्छाव

IMG-20230531-WA0110.jpg

वारकरी मंच च्या महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात शाखा सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार

नियुक्ती प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धी प्रमुख रामभाऊ आवारे यांचे प्रतिपादन

दैनिक युवा मराठा
निफाड रामभाऊ आवारे

हिंदू धर्मातील संतांच्या विचारांचा प्रचार प्रसार व्हावा, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत संतांचे विचार पोहोचले जावे, प्राथमिक शिक्षणापासूनच्या शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना अध्यात्माचे धडे दिले जावे, शाळा महाविद्यालयामध्ये संत साहित्यांचा अभ्यास या विषयावर परीक्षा घेऊन त्यांना बक्षीस देऊन प्रेरणा मिळावी या उद्देशाने प्रेरित होऊन स्थापन करण्यात आलेल्या वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रभर कार्यरत असलेल्या वारकरी मंचच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी मी कार्यरत असून पुन्हा एकदा वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे देशमुख आळंदीकर यांनी प्रदेश प्रसिद्ध प्रमुख म्हणून जी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी मी समर्थपणे वरिष्ठांच्या आदेशानुसार सार्थ ठरविण्याचा प्रयत्न करणार असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात वारकरी मंचच्या शाखा स्थापन करण्यासाठी आपण वरिष्ठांच्या आदेशानुसार प्रयत्न करणार आहोत असे विचार वारकरी मंच प्रदेश कार्याध्यक्ष पत्रकार रामभाऊ आवारे सर (वनसगाव) यांनी केले आहे.
ते वारकरी मंचच्या प्रदेश प्रसिद्धी प्रमुख पदावर दिलेल्या दुहेरी जबाबदारीच्या नियुक्ती प्रसंगी बोलत होते. ‌
वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा हीच एकमेव वारकरी मंचचे उद्दिष्ट असून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व तालुक्यात लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणी करण्यात येणार असून वारकरी मंचचे कार्य महाराष्ट्रभर पसरविण्यासाठी वारकरी मंच महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी प्रयत्नशील आहे.
अध्यात्मिक विठ्ठल रखुमाई विचार मंचचे मुख्य संचालक तथा निफाड विशेष प्रतिनिधी रामभाऊ विठ्ठलराव आवारे (वनसगाव) यांच्या अध्यात्मिक कार्याच्या व वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराच्या उल्लेखनीय कार्याचा विचार करून वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष ह भ प निलेश महाराज कोंडे देशमुख आळंदीकर यांनी महाराष्ट्र प्रदेश प्रसिद्धीप्रमुख पदी निवड केली आहे.
वारकरी मंचच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचे एक स्टार प्रचारक म्हणून नावलौकिक मिळविला असून वारकरी मंचचे महाराष्ट्रभर मजबूत संघटन व प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात वारकरी मंचचे विस्तारीकरण करणार असून वारकरी मंच संस्थापक अध्यक्ष आमचे मार्गदर्शक ह भ प निलेश महाराज कोंडे देशमुख आळंदीकर यांनी माझ्यावर दिलेली ही दुहेरी जबाबदारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सहयोगातून सार्थकी करण्याचा माझा प्रयत्न असेल असे नियुक्तीप्रसंगी त्यांनी सांगितले आहे.
वारकरी मंचच्या दुहेरी जबाबदारी बद्दल वारकरी मंच महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेश कोंडे- देशमुख (आळंदी देवाची), प्रदेश संघटक शरद आढाव, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष ह भ प मधुकर महाराज जाधव आगाशिवनगर, ब्राह्मण महासंघ विश्वस्त स्मिताताई कुलकर्णी, मा चेअरमन राजाबाबा होळकर, कृषीतज्ञ सचिन दादा होळकर, भागवताचार्य शुभदाताई लोहार सांगली, हभप विठोबा दादा आवारे,हभप विनायक महाराज वाघ,रामायणाचार्य हभप मिनाताई महाराज मडके गदेवाडी शेवगाव, मुख्य संचालक शंकरराव कोल्हे नैताळे, भागवताचार्य सीमाताई राजेंद्र काळे चांदवड,रत्नाताई चांदगुडे पाटील शिर्डी, प्राचार्य सी डी रोटे सर विंचूर, नवनाथ माऊली बोरगुडे नैताळे अशोकराव पगार सर मनमाड, लक्ष्मणराव आवारे सर,सौ कमलताई गायकवाड म्हसरुळ,सौ मनिषा भोर कुंदेवाडी,बाबुराव पाटील सानप शिवडी, भास्कर आबा मांजरे धामोरी, साहेबराव आण्णा कुयटे आहेरगाव,नाथभक्त उमेश आप्पा चव्हाण दरसवाडी, सौ रिनाताई सोनवणे,सौ मंगलताई सासवडे, संगिताताई तावरे,सौ रमाताई आठवले शिक्रापूर पुणे, गणेश माऊली दवंगे माहेगाव देशमुख, शंकरराव भवर,अरुण भाऊ घायाळ नैताळे आदींनी अभिनंदन केले आहे.

Previous articleकर्तव्यदक्षक तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे संग्रामपुरकपाशीची लागवड १ जूननंतर करावी : कृषी अधिकारी बनसोडे
Next articleअमरावती शहरात प्लास्टिक बंदीची मोहीम जोरात सुरू
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here