आशाताई बच्छाव
संपादकीय अग्रलेख… “श्री.गणेश तुला सदबुध्दी कधी मिळणार?” वाचकहो, आम्ही श्री.गणेशला सुखकर्ता,दुःख हर्ता म्हणतो,प्रत्येक शुभकार्यात गणेशाची पुजा करतो.गणेश हा सुखकारक व आनंददायक संदेश देणारा म्हणून ओळखला जातो.मात्र व-हाणे प्रकरणात चौकशी समितीच्या नावाखाली नियुक्त केलेला गणेश अर्थातच नांदगावचे गटविकास अधिकारी गणेश चौधरी हा पौराणिक काळातील गणेशाच्या विचारांनुसार न वागता,व-हाणेत येऊन चौकशी करण्याच्या नावाखाली नको ते उपद्व्याप भामटया सडकछाप राजकारण्यांच्या दडपणाला बळी पडून व आर्थिक मलिदा घशात घालून खरेचे खोटे प्रमाणे चौकशी अहवाल बनवून मार्गस्थ झाले खरे.गणेशाने अर्थातच गणेश चौधरी यांनी आपल्या कर्तव्यांशी व असलेल्या नोकरीशी प्रामाणिकता दाखवून इमानदारीने कर्तव्य न करता व-हाणे चौकशी प्रकरणात अक्षरशः बेईमानी केली.सगळेच अधिकार जर मालेगांवच्या गटविकास अधिकाऱ्यांना होते व त्यांनीच कारवाई करण्याचे मत जर गणपती मांडतो तर हा निव्वळ चौकशी समितीचा फार्स व स्टंटबाजी कशासाठी? गत तीन वर्षापासून चालविलेली युवा मराठाची फसवणूक व दिशाभूल आणि वेठीस धरण्याचे प्रयोजन प्रशासनाच्या कसे अंगलट येणार आहे हे लवकरच कळेल.मात्र आमच्या एक निर्दशनास आले की,एका महिलेला तिच्या चुकावर पांघरुण टाकून वाचविण्यासाठी संपूर्ण जिल्हा भरातील अधिकाऱ्यांची कशी उठाठेव सुरु आहे हे या निमिताने समोर आले आहे.व-हाणे प्रकरण हे कधी न संपणारे असून,अधिकाऱ्यांनी निदान नितीमतेची चाड व आपल्या लेकराबाळांची आण(शपथ) घेऊन काम केल्यास निश्चितच हा प्रश्न चुटकीसरशी मोकळा होऊ शकतो.अन्यथा चौकशी समितीच्या नावाखाली एन्जाँय ट्रिपला आलेल्या चौकशी समितीने हाँटेलात झोडलेल्या पार्ट्या व आणखीन खिसा गरम हे खुप सांगून जाते.अर्थातच आता व-हाणेतही काय ते डोंगार…काय ते हाटील असे म्हणण्याची वेळ आली आहे.पण…सावधान कधी आपण अडकू नये हिच अपेक्षा या निमिताने सदराया सदगुणी गणपती बाप्पा आपणांस देवो, याच गणेश (चौधरी) नव्हे प्रार्थना !