आशाताई बच्छाव
तहसीलदारांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे
आदिवासी पारधी महासंघ चे जिल्हाध्यक्ष आकाश साळुंके ,भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष राकेश घोडे यांना सरबत देऊन स्थगित केले उपोषण
मनोहर देवरे
युवा मराठा न्युज नेटवर्क
पालघर जिल्ह्यातील धानीवरी येथील आदिवासी समाजावर जो अन्याय झाला त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून न्याय मिळावा व त्यांचे पुनर्वसन करावे अशी मागणी आदिवासी पारधी महासंघ चे जिल्हा अध्यक्ष आकाश साळुंके व भाजपा युवा जिल्हा उपाध्यक्ष राकेश घोडे यांनी सटाणा पोलिस स्टेशन चे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे व नायब तहसिलदार बी.जे.बहिरम यांच्याकडे केली होती मात्र यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही आजपर्यंत करण्यात आलेली नाही त्यामुळे मंगळवार दि.30 रोजी सटाणा तहसील आवारात आमरण उपोषणाला बसण्याचा निर्णय घेण्यात आला होता
दि.१९/४/२०२३ रोजी मौजे-धानिवरी, ता. डहाणू, जि.पालघर येथे सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी डहाणू यांनी (मुंबई-वडोदरा राजमार्ग) यांच्या आदेशाने,पोलिस
प्रशासने आदिवासी परीवारांवर अमानुष असा अन्याय-अत्याचार करून, त्यांना बेघर करण्यात आले होते. याचे चित्रीकरण पूर्ण भारत देशाने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिले होते. हे पाहून काळीज अक्षरशः पिळवटून येते. गरीब, अज्ञानी आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या जमिनी कसत आलेला आहे. अजूनही कसतोय परंतु त्याच्या अशिक्षित-अडाणी पणामुळे पणामुळे,त्यांची जमीन त्यांना नावावर करून घेता आली नाही किंवा महसूल प्रशासनानेही स्वतःहून सहकार्याची भावना दाखविली नाही. अशातच त्या जमिनीवरून मुंबई-वडोदरा राजमार्ग जात असल्याने, शेठ, सावकार जागे होवून जाणून बुजून कायद्यावर बोट ठेवून, आदिवासींना त्रास देवू लागले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धानिवरी गावात घर,झाडे यांचा मोबदला न मिळाल्याने व जोपर्यंत आम्हाला मोबदला देणार नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाहीत असा पवित्रा तेथील पीडित स्थानिक आमच्या आदिवासी बांधवांनी घेतल्यामुळे, पोलिस प्रशासनाने जबरदस्तीने वयोवृध्द महिला, शाळकरी मुले यांना खेचत घराबाहेर काढले, तसेच जबरदस्तीने त्यांच्या घरावरील कौले उतरविण्याचा जो भयंकर प्रकार समोर आल्याने, अक्षरशः या देशात लोकशाही आहे की तानाशाही, ठोकशाही आहे हेच समजायला मार्ग राहिला नाही. या घटनेने मानवजातीला काळीमा फासला गेला आहे.आपल्या देशात लोकशाही मृत स्वरुपात आहे की काय? असे क्षणिक वाटू लागले आहे. सदर घटनेचा निषेध करू तितका कमीच आहे.तरी शासन-प्रशासनाने संबंधितांवर कार्यवाही करून, आमच्या आदिवासी बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली होती मात्र याकडे डोळे झाक करण्यात येऊन आत्तापर्यंत कार्यवाही किंवा निर्णय घेतला गेला नाही त्यामुळे तहसील आवारात आमरण उपोषनाचा इशारा देण्यात आला होता त्यानुसार आज रोजी त्याठिकाणी आमरण उपोषण सुरू करण्यात आले होते परंतु भाजपा तालुका अध्यक्ष संजय देवरे व शहर अध्यक्ष राहुल सोनवणे यांनी यथोचित चर्चा घडून आणली आणि शिष्टाई यशस्वी झाली
तात्काळ प्रभारी तहसीलदार रावसाहेब सूर्यवंशी यांनी भेट दिली व त्यांच्या आश्वासनंतर जिल्हाध्यक्ष आकाश साळुंके व राकेश घोडे यांना सरबत देऊन उपोषण स्थगित करण्यात आले तहसील कार्यालय बागलाण उपोषणास बसलेले निसर्ग मित्र राकेश घोडे,आदिवासी पारधी महासंघ चे जिल्हाध्यक्ष आकाश साळुंके यांना
भाजपा जेष्ठ नेते डॉ.शेषराव पाटील ,भाजपा तालुका अध्यक्ष संजय देवरे,ऋषिकेश घोडे,भाजपा शहराध्यक्ष राहुल दादा सोनवणे ,श्रीधर कोठावदे,भास्कर पगार ,संदीप पवार, देवेंद्र पवार अँटी करपशन तालुका अध्यक्ष सुनील वाघ,किशोर कदम काँग्रेस शहर अध्यक्ष , माजी नगर अध्यक्ष विजय वाघ राष्ट्रवादी काँग्रेस, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास बछाव,गजेंद्र चव्हाण बापू बागुल शिवसेना उपजिल्हाप्रमुख,रवींद्र सोनवणे शिवसेना शहर प्रमुख,संजय पाठक , महेंद्र खैरनार जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल काँग्रेस दिव्यांग संघटना नाना कुमावत,विजय कुमावत ,शालिनी कापडणीस, किरण आहिरे, अजिंक्य जगताप,प्रकाश कुमावत, सरपंच लखन पवार,सदस्य दीपक रौदळ, सहिद मुल्ला,जेडी पवार , केशव सूर्यवंशी शेतकरी संघटना,विलास सोनवणे,दीपक जपानी नंदाळे,राकेश जगताप ई.पदाधिकऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला होता.