आशाताई बच्छाव
चांदूरबाजार तालुक्यातील बेलूरागडी येथे शेतकऱ्यांच्या
नावावर वाळू व मुरूम ची अवैद्य वाहतूक, गुन्हे दाखल करणार काय.
दैनिक युवा मराठा वृत्तसेवा.
पी .एन .देशमुख.
ब्युरो चीफ रिपोर्टर.
अमरावती.
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुका बेलुरागडी या गावात शेतकऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक महसूल विभागाने दोन दिवसापूर्वी ४२ब्रास वाळू जप्त करून ती घरकुल लाभार्थी यांना मोफत वाटप केले. ती वाळू शेतकऱ्याने घेतलेल्या परवानगीच्या नावाखाली ने आन केली जात होती. जिल्ह्यातील अशा प्रकारची पहिली कारवाई आहे. बेडूरागडी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणात टिप्पर आणि ट्रॅक्टरने वाळूची वाहतूक केली जाते. याबाबत अधिक माहिती घेतली असता शेतकरी आनंद अटल कार यांनी जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे गट क्रमांक ६ मधून वाळू उचलण्यासाठी परवानगी मागितली होती त्याआधारे त्यांना ८०ब्रासची परवानगी जिल्हा स्तरावरून घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष त्या ठिकाण्यावरुन८०ब्रासपेक्षा अधिक वाळू विक्री केली गेली. जेव्हा महसूल अधिकारी त्या ठिकाणी कारवाईसाठी गेले तेव्हा शेतकरी यांनी माझा या वाळू वाहतुकीची काही संबंध नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या नावाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू तस्करी सुरू असल्याचे स्पष्ट झाली. अशाच प्रकार महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सीमेवर मुरूम वरती किंवा बस सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. मुळात बेलुरा गाडी या ठिकाणावरून वाळू वाहतूक सुरु होती. वाहनाची माहिती असून देखील महसूल विभागाकडून त्या वाहणार गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे या अवैध वाळू तस्करीला महसूल विभागाकडून पाठबळ दिले जात आहे का. असा प्रश्न उपस्थित होत आहे. तामसवाडी, हीरूळपूर्ण, पूर्ण मध्यम प्रकल्प, धानोरा या ठिकाणी भाजप पदाधिकारी गोपाल तीरमारे,मुरली माकोडे यांनी होत असलेल्या अवैध वाळु होत असल्याचे पुरावे संबंधितांना दिले होते. त्यानंतर कारवाई सुरू झाली. चांदूर बाजारातील या कामासाठी एकच नायब तहसीलदार आहे. संपूर्ण तालुका भर त्यांनाच लक्ष ठेवावे लागते. त्यामुळे रिक्त असलेल्या नाहीत तहसीलदार पदाकडे आमदार बच्चुभाऊ कडू यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे. अमरावती जिल्हा खनि कर्म अधिकारी इमरान शेख मनाली की शेतकरी यांनी वाळू काढण्याच्या परवानगीसाठी कायदेशीर बाबी पूर्ण करून अर्ज केला होता. त्या आधारे त्यांना ८०ब्रासची परवानगी देण्यात आली होती. मात्र त्या ठिकाणी त्यांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर अवध्य वाळू तस्करी होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून आता अवैध वाळू तस्करासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहन दाताची चौकशी करून गुंडा दाखल करण्यासाठी पत्रा देण्यात येणार आहे.