आशाताई बच्छाव
काटेल धाम येथे शासन आपल्या दारीं… योजना
सर्व शेतकरी,सर्वसामान्य लोकांनी लाभ घ्यावा उपविभागीय अधिकारी काळे यांचे आव्हाहन
संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे शासन आपल्या दारीं महाराष्ट्र शासनाचे हे अभियान दि.29 मे रोजी वर्णी लागणार आहे. या योजनेचे निवेदन संग्रामपूर तालुक्यातील अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या वतीने दि.9 मे रोजी तहसीलदार संग्रामपूर यांना देण्यात आले होते. निवेदनाचा पाठपुरावा करत तालुक्यातील सर्व शेतकरी, शेतमजूर, सर्वसामान्य लोकांना या योजनेचा लाभ मिळावा करिता उपविभागीय अधिकारी काळे जळगाव जा यांच्या सह .,तहसीलदार संग्रामपूर, मंडळ अधिकारी, तलाठी, तसेच पत्रकार मंडळी यांनी एकत्र येऊन ही योजना राबवीन्या करिता काटेल येथे कार्यक्रम स्थळी दि.25 मे ला भेट देऊन योजनेचेपुर्व नियोजन केले आहे
या योजनेमध्ये आधार कार्ड, शिधा पत्रिका, श्रावण बाळ, वृद्धापकाळ,विधवा, दिव्यांग-योजना तसेच संजय गांधी निराधार योजना,वीज कनेक्शन,जन्म मृत्यूच्या नोंदी राज्य निवृत्ती योजना तसेच इतर अनेक शासनच्या वेगवेगळ्या योजनाचा लाभ नागरिकांना थेट एकाच ठिकाणी, एकाच वेळी घेता येणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेतून राज्यात शासन आपल्या दारी हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ 13 मे 2023 रोजी सातारा जिल्ह्यात मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यातील किमान 75 हजार लाभार्थ्यांना एका शताखाली लाभ देण्यात मिळणार असून निर्धारित शुल्क, 200 हून अधिक योजना, कमीत कमी कागदपत्रे, तर जलद मंजुरी करिता शासन आपल्या दारीं ही योजना अमलात आली आहे हे विशेष..
संग्रामपूर तालुक्यात काटेल येथे दि 29 मे ला होणाऱ्या शासन आपल्या दारीं योजनेच्या कार्यक्रमासाठी पाहणी करण्यात आली






