Home नाशिक दहिवड येथील वादग्रस्त खडी क्रेशर बंद करण्याचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर 

दहिवड येथील वादग्रस्त खडी क्रेशर बंद करण्याचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर 

766
0

आशाताई बच्छाव

IMG-20230525-WA0054.jpg

दहिवड येथील वादग्रस्त खडी क्रेशर बंद करण्याचा ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर
(युवराज देवरे युवा मराठा न्यूज)
गेल्या कित्येक दिवसांपासून दहिवड (रामनगर) शिवारात नव्याने सुरू होत असलेल्या खडी क्रेशर बंद करावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केलेली होती.सर्व प्रकारचे निवेदने, व उपोषणे करून हा प्रश्न सुटत नव्हता.
गावात मोठ्या प्रमाणात वाद विवाद वाढत होते.
या खडी क्रेशर मुळे स्थानिक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होणार होता.पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न किंवा शेतीच्या पिकांचे नुकसान , श्वसनाचे आजार, इत्यादी गोष्टी लक्षात घेऊन हे काम बंद करावे अशी मागणी करण्यात येत होती.त्यामुळे अति तातडीची ग्रामसभा बोलवण्यात आली होती.
या ग्रामसभेत खालील ठराव मंजूर करण्यात आले.
1) स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा.
2) गावात राजकीय पुढाऱ्यांना गाव बंदी.
3) खडी क्रेशर बंद करणेबाबत.
या वेळी दहिवड ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री सुर्यवंशी साहेब,विद्युत कंपनीचे सा.अभियंता,सरपंच पुष्पा पवार,उपसरपंच राजाराम ठाकरे, ग्रा. प.सदस्य,यशोदा पिंपळे,संजय दहिवडकर,पुंजाराम देवरे,नारायण देवरे,दिलीप पवार,बापू मोरे,मधुकर पवार,शिवाजी सोनवणे,बाब्या(शरद) देवरे,संदीप पवार,गणेश बोराडे,दादा बोराडे, बंटी सोनवणे,शरद अहिरराव,संजय देवरे,दगडु पवार,प्रवीण अहिरराव,समाधान देवरे,अनिल ठाकरे,समाधान सोनवणे, राजेंद्र सोनवणे,व इतर स्थानिक महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सर्वानुमते हा प्लांट बंद चा ठराव मंजूर करण्यात आला.

Previous articleपतीसह कुटुंबियांना अटकपूर्व जामीन
Next articleकाटेल धाम येथे शासन आपल्या दारीं… योजना
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here