आशाताई बच्छाव
काटेल येथे अवकाळी वाऱ्याने भिंत कोसळुन दोन वर्षाच्या मुलीचा मृत्यू !
p
संग्रामपूर तालुक्यातील काटेल येथे दिनांक ७ एप्रिल रोजी दुपारी चार वाजता च्या दरम्यान अवकाळी वादळामुळे येथील श्री गणेश रमेश बोरवार त्यांच्या राहत्या कवेलु मातीच्या घराची भिंत कोसळून त्यांच्या दोन वर्षाच्या मुलीचा आकस्मिक अवकाळी वादळामुळे कोसळलेल्या भिंतीखाली दबून मृत्यू झाला असून दुसरी मुलगी नामे राधा गणेश बोरवार ती सुद्धा जखमी झाली असून मृत मुलीचे नाव कृष्णाली असे आहे. घटनेचा पंचनामा पोलीस पाटील व उपसरपंच यांनी केला असून तसा अहवाल तहसीलदार संग्रामपूर यांच्याकडे सुद्धा पाठवला आहे. मुलींचे वडील गणेश बोरवार हे काटेल येथील शांती नगरात राहतात येथे बरेचसे कुटुंब असे आहेत की ज्यांना मोल मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. आणि खऱ्या अर्थाने असे कुटुंब शासनाकडून घरकुल मिळण्याकरिता पात्र असून सुद्धा अद्याप पर्यंत त्यांच्याकडे राहायला पक्के घर नसून जीर्ण अवस्थेत असलेल्या घरामध्येच राहावे लागते. तरी मतदारसंघातील लोकप्रतिनिधींनी संग्रामपूर पंचायत समितीकडे लक्ष घालून चिरीमिरी करून बऱ्याच धनाढ्य लोकांना घरकुलाचा लाभ देणे सुरू आहे. अशा नियमबाह्य कामाला लगाम लावावा व ज्यांना खऱ्या अर्थाने पक्के घर नाही, घरावर छत नाही, केव्हाही भिंती कोसळून अशा प्रकारे आकस्मिक मृत्यू होऊ शकतो. अशा लाभार्थ्यांना लवकरात लवकर आपल्या हक्काचं घर मिळवून द्यावं तसेच या अवकाळी वादळात भिंत पडून मृत्यू झालेल्या मुलीच्या कुटुंबीयाला योग्य ते मदत मिळवून द्यावी. व खऱ्या अर्थाने गोरगरिबांना न्याय द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे