आशाताई बच्छाव
भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच स्वराज्य संघटनेच्या सुरेश पवारांचा दावा..
मनोहर देवरे (प्रतिनिधी युवा मराठा न्यूज नेटवर्क)
पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची घोषणा झाल्यापासून इथे अनेक नाट्यमय घडमोडी आणि अनेक ट्विस्ट पाहायला मिळत असून अजूनही हे सुरूच आहे. आता स्वराज्य संघटना मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळेल असा खळबळजनक दावा स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी केला आहे. त्यामुळे पदवीधरमध्ये पुन्हा एक नवा ट्विस्ट आला आहे. बहुचर्चित अशी नाशिक पदवीधरचा रंग आता आणखी वाढणार असून भाजपा सुरेश पवार यांना पाठिंबा देणार का? आणि दिला तर नक्कीच ही निवडणूक तिरंगी होणार असून सामना आणखी रंगतदार होणार आहे.
नाशिक पदवीधरमध्ये आतापर्यंत अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले असून या निवडणुकीत मोठी रस्सीखेच पाहायला मिळत आहे. सत्यजित तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर या निवडणुकीचे चित्र दिवसेंदिवस बदलत चालले असून तांबे सोबतच पाठिंबा मिळवण्यात शुभांगी पाटील ह्या देखील आघाडी मिळवत आहेत. त्यातच तांबे यांना भाजपचा छुपा पाठिंबा असल्याच्या चर्चा असतनाच आता स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराने केलेल्या दाव्यामुळे राजकारण बदलाचे चिन्ह आहेत.
भाजप आणि शिंदे गटाचा पाठिंबा आम्हालाच मिळनार असल्याचे स्वराज्य संघटनेचे उमेदवार सुरेश पवार यांनी दावा केला आहे. तसेच संभाजी महाराज यांच्या माध्यमातून भाजप आणि शिंदे गटासोबत बोलणी सुरू असून उद्यापर्यंत नाशिक पदवीधर मतदारसंघात तुम्हाला नाट्यमय घडामोडी पाहायला मिळेल स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते कारण गायकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे नाशकात उद्या काय चित्र असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपचे राधाकृष्णन विखे-पाटील यांनी कालच स्पष्ट केले होते की, कोणाला पाठिंबा द्यायचा याबद्दल अद्याप पक्ष विचार करत असून लवकरच पाठिंबा जाहीर करणार आहोत. मात्र आता स्वराज्य संघटनेच्या या दाव्यामुळे भाजप त्यांना पाठिंबा देणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.