आशाताई बच्छाव
वीरभद्रेश्वर विवाह सोहळ्यास भाविकांचा उदंड प्रतिसाद
मुखेड प्रतिनिधी (बस्वराज स्वामी वंटगिरे यांच्याकडुन)
मुखेड तालूक्यातील मुक्रमाबाद येथे दि. २०/०१/२३ शुक्रवार रोजी संध्याकाळी ठिक ९.५ वाजता वीरभद्र मंदिरात वीरभद्र स्वामीजीचां विवाह सोहळा व अग्नी कुंड सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला.मंदिराच्या मुख्य गाभार्यात व मंडपात फुलांने सजावट केली होती.अतीशय उत्साहात सर्व विधीपूर्वक सर्व भक्तांच्या साक्षीने हा विवाह सोहळा संपन्न झाला.यावेळी मुक्रमाबाद नगरीचे सरपंच सौ.अजीता ताई बालाजी बोधने,शिवयप्पा वंटगिरे,राजलिंग वंटगिरे, प्रसाद दाते मुरलीधर मनोहर होमकर, बालाजी अप्पा बोधने,राजेश्वर देशमुख, धर्मराज बोधने,अनील देशमुख,श्रीकांत आवडके, सोमनाथ अप्पा मठदवरु,राचप्पा स्वामी, पुजारी बस्वराज स्वामी वंटगिरे यांच्या हस्ते पुजा व आरती करण्यात आले. लग्नानंतर लगेच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेश पंचाक्षरे, नागनाथ थळपत्ते, बालाजी पसरगे,कैलास आवडके, सतीश एमेकर,पंचप्पा मठदेवरु, हेमंत खंकरे, रमाकांत बोधने,अनुप खळुरे,सागर पांचाळ,प्रणव आवडके, ओम होमकर,शरणप्पा थळपत्ते,अमोल एमेकर, कृष्णा सोलापुरे, कैलास सोलापुरे, परमेश्वर खळुरे, दिलीप आवडके, बसवराज थळपत्ते, रमाकांत भंगे, संदीप खंकरे, महेश खंकरे, बाळू खंकरे,शिवकुमार बोधने,दीलीप गळगे इतर सर्व भक्तांनी परीश्रम घेतला.व हजोराच्या संख्येने भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती.महाप्रसादासाठी मोठा प्रतिसाद मिळत आहे.ई.स.२०३१ पर्यंत बुक आहेत अशी माहिती पुजारी बस्वराज स्वामी वंटगिरे यांनी दिले.