Home पुणे संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

271

आशाताई बच्छाव

IMG-20221121-WA0110.jpg

संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन.

शिवद्रोही राज्यपालांची हकालपट्टी करा:-अमोल काटे                                                                पुणे,(उमेश पाटील प्रतिनिधी)

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अवमान कारक वक्तव्य केल्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने थेरगाव येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. तसेच भाजप प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असे बेताल वक्तव्य केल्यामुळे त्यांचा देखील यावेळी तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कोशाध्यक्ष अमोल काटे निषेध व्यक्त करतांना म्हणाले की राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत केलेली आहे. यापुर्वीही राज्यपालांनी समर्थ के बिना शिवाजी कौन पुछेंगा असे वक्तव्य करून छत्रपती शिवरायांचा अवमान केला होता. तसेच सावित्रीमाई व फुले महात्मा फुले यांच्या
बाबतीतही अवमान कारक वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यपाल हे शिवद्रोही असून वांरवार बहूजन महापुरुषांची बदनामी करत आहेत त्यामुळे राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी अन्यथा संभाजी ब्रिगेड राज्यपालांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असे अमोल काटे म्हणाले.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष रमेश हांडे प्रदेश संघटक अजय भोसले यांनी देखील अतीशय तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी दक्षिण पुणे जिल्हा अध्यक्ष अजय सिंह सांवत उत्तर जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष सतिश काळे पुणे शहर अध्यक्ष हर्षवर्धन मगदुम जिल्हा उपाध्यक्ष अशोक काकडे सचिव गणेश कुंजीर कार्याध्यक्ष अनिल माने हवेली तालुका प्रशांत नरवडे उपाध्यक्ष प्रशांत कुंजीर वैभव शिंदे रविंद्र पवार संजय शिरोळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleग्रामपंचायत चकपिरंजीच्या वतीने तहसीदारांना निवेदन
Next articleकोयाळीच्या यात्रेत देव-दानव युद्धाचा थरार…
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.