आशाताई बच्छाव
कोयाळीच्या यात्रेत देव-दानव युद्धाचा थरार… खेड,(मयुर चव्हाण प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
श्री क्षेत्र कोयाळी भानोबाची (ता. खेड, जि. पुणे) येथे श्री भानोबाचा उत्सव व यात्रेनिमित्त हजारो भाविकांनी देव-दानव युद्धाचा थरार अनुभवला.
पूर्वी शिवभक्त भानोबा देवाला कपट करून तस्करांनी मारले होते. एक दिवस माझ्यासाठी तुम्हाला मरावं लागेल, असा शाप त्यावेळी श्री भानोबा देवाने त्यांना दिला होता. त्यामुळे श्री भानोबा देवाच्या शापानुसार तस्करांना आज ही देवाशी युद्ध करावे लागत असल्याचे येथे दिसून येत आहे.
दि. 24 नोव्हेंबर रोजी कोयाळी यात्रेच्या पहिल्या दिवशी ढोल ताशांच्या गजरात श्री भानोबा (राहुटी ) मंदिरापासून देव-दानवांच्या युद्धाला सुरूवात झाली. भानोबा देव (जन्मस्थ) मंदिराकडे प्रस्थान करत असताना त्यांच्यासमोर मानवरुपी तस्कर दानवांनी आपली हातातील शस्त्र (काठी) देवासमोर फिरवून उड्या घेतल्या.मात्र देवाच्या (देवाचा मुखवटावर घेतलेल्या ) नजरेला नजर पडल्यानंतर ते त्याक्षणी जमिनीवर कोसळतात. जन्मस्थ मंदिर परिसरापर्यंत हे युद्ध खेळले गेले. युद्ध खेळते वेळी जमिनीवर कोसळणाऱ्या सर्व तस्करांना येथील जन्मस्थ मंदिरासमोर उचलून आणून जमिनीवर रांगेत पालथे ठेवले जाते. त्यानंतर श्रीं भानोबाचा त्यांना स्पर्श दिला गेला. श्रींचे तीर्थजल त्यांच्यावर शिंपडले जाते. त्यानंतर पडलेल्या तस्करांच्या कानात उपस्थित तरुण भाविकांनी जोरजोरात भानोबाच्या नावानं चांगभलं असा भानोबाचा जयघोष करून त्यांना शुद्धीवर आणले.
दि.25 नोव्हेंबर रोजी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा दुपारी बारा वाजता देव दानव युद्ध जन्मस्थ मंदिरा समोर खेळले जाणार आहे. कोयाळी श्री भानोबा उत्सव व यात्रा 3 दिवस चालते.पहिल्या व दुसऱ्या दिवशी देव-दानव युद्ध खेळले जाते. ते पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.