आशाताई बच्छाव
वानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे खडीकरण करा. अन्यथा संघर्ष पेटणार! प्रशांत डिक्कर.
स्वप्निल देशमुख
संग्रामपूर/ तालुक्यातील वानखेड ते रिंगणवाडी रस्त्याचे तत्काळ खडीकरण काम चालू करा अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी जि.प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यु पि.बुरजे यांचेकडे निवेदनातून केली आहे. वानखेड रिंगणवाडी रस्त्या लगत हजारो एक्कर सुपिक जमीन आहे.पंरतु रस्ता चिखलमय असल्यामुळे बैलबंडी या कोणत्याही प्रकारचे वाहन जावु शकत नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या शेतातील शेतीमालाची रस्त्याने वाहतूक करता येत नसल्याने सर्व माल शेतातच सडुन जात आहे. याचा सर्व भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
तसेच रिंगणवाडी ते वानखेड गावाचे अंतर कमी असल्याने सर्व रुग्ण वानखेड आरोग्य केंद्रात उपचार घेत होते. पंरतु रस्त्या अभावी येथिल रुग्णांची गैरसोय होते वेळेवर उपचार मिळु शकत नाही. त्यामुळे या रस्त्याचे तत्काळ खडीकरण करण्यात यावे अन्यथा परिणामाची चिंता न करता संघर्ष अटळ आहे. असा ईशारा स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी स्वाभिमानीचे विलास तराळे, वासुदेव कु-हाडे, मनोज पालीवाल, राजेंद्र ढगे, शहादेव भोपळे, सुरेख सांगळे, जगन्नाथ कु-हाडे, जगन्नाथ हागे, संतोष अमझरे, नारायण मिसाळ, कैलास बघे, उमेश मिसाळ, आनंद हागे, पप्पू चांडक, गजानन म्हस्के, मोहन हागे, प्रल्हाद हागे, मनोज हागे, राहुल हागे, अमोल रौंदळे, गजानन मस्के, मोहन हागे,आनंद हागे,प्रवीण रौदळे, राहुल डांबरे, विठ्ठल कुरवाडे, हरीदास अमझरे, राजेन्द्र हागे, यांच्या सह वानखेड येथिल बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.