आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: यावर्षी संपूर्ण देशात पावसाचा हाहाकार! यावर्षी संपूर्ण देशात पावसाने हाहाकार माजवला आहे. संपूर्ण देशात काही ठिकाणी दहा वर्षे काही ठिकाणी पंधरा वर्षे काही ठिकाणी 25 वर्ष अशाप्रमाणे विक्रमी पाऊस यावर्षी पडला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व चारही धरण पूर्ण क्षमतेने भरलेले आहे त्यामध्ये खडकवासला, पानशेत ,मुळशी, वीर धरण अशा प्रकारे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहेत, त्यांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विसर्ग सुरू आहे .नाशिकमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. अमरावती, बुलढाणा, नांदेड त्याचबरोबर मुंबईतील सर्व धरण हे पूर्ण क्षमतेने भरले आहेत त्यामुळे मुंबईकरांचे पाण्याची चिंता मिटलेली आहे. एकंदरीत पाहता संपूर्ण देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात यावर्षी पाऊस पडलेला आहे. काही ठिकाणी या पावसाचा पिकांना फायदा होतोय, तर काही ठिकाणी याच पावसाचा पिकांना खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले आहे. शेतकरी चिंताग्रस्त आहेत, काही ठिकाणी घर, गाड्या, झाडे यांचे नुकसान पाहायला मिळते. यावर्षी पावसाने संपूर्ण देशामध्ये हाहाकार माजवला आहे हे नक्की.






