आशाताई बच्छाव
टाटा समूहाचे माजी अध्यक्ष उद्योगपती सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन
—अपघाताचा महामार्ग म्हणून प्रचलित मुंबई अहमदाबाद महामार्गांवर झाला अपघात
पालघर,(वैभव पाटील)
उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा चारोटी येथे अपघातात मृत्यू झाला आहे. ते टाटा ग्रुपचे माजी चेअरमन होते. त्यांच्या अपघातामुळे उद्योगविश्वाला मोठा धक्का बसला आहे. आज दुपारी ३ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान मुंबई अहमादाबाद महामार्गावरील सुर्या नदीच्या पुलावर डीवायदार धडकून अपघात झाला आहे. सायरस मिस्त्री यांच्य सह दोन लोक दगावल्याची माहिती समोर आली असून मर्सिडीज गाडी क्र. MH 47AB 6705 ही गाडी डिव्हायडरला धडकल्याने सदर अपघात झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ते गुजरात हुन मुंबईच्या दिशेने येत होते. यातील प्रथम दोघेजण जागीच मृत्यूमुखी पडले होते, तर इतर दोघांना चारोटी रुग्णालयात हळविण्यात आले आहे. आणि तिथून त्यांना गुजरातच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.
नेहमी अपघात ग्रस्त म्हणून प्रचलित या पुलावर महामार्ग प्राधिकरण आणि कंत्राटदार कंपनी फक्त टोल वसुली करीत असते, पण इंजिनिअरिंग डिफेक्त असलेल्या या ब्रिज चे सुधारणा करण्यास नेहमी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप महामार्गांवर अपघात ग्रस्ताना मदत करणाऱ्या नागरिकांनी केला आहे. आता देश्याच्या एवढ्या मोठ्या उद्योगपतीचा बळी घेतल्यानंतर तरी या महामार्गवरील सुधारणा होतील का ?