आशाताई बच्छाव
अतिवृष्टी सर्वे यादीमध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे नावे समाविष्ट करा! अन्यथा जास्तगाव येथील शेतकऱ्यांचे आमरण उपोषण..
ज्ञानेश्वर पाटील दांदळे
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर:-तालुक्यातील जस्तगांव येथे गत दीड ते दोन महिन्यापूर्वी ढगफुटी व अतिवृष्टी झाल्याने जमीन व त्यातील उभे पीक खरडून गेल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र येथील कृषी साहाय्यक व तलाठी यांनी नुकसान झालेल्या शेताच्या बांधावर न जाता अतिवृष्टीचे सर्वे केले त्यामुळे बरेचसे शेतकरी अतिवृष्टी सर्वे पासून वंचित ठेवले त्यामुळे अतिवृष्टीचे सर्वे पुन्हा करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्या अन्यथा 30 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करू असा इशारा जस्तगांव येथील शेतकऱ्यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
सदर दिलेल्या निवेदनात नमुद आहे कि कृषी सहाय्यक इंगळे, तलाठी पाटील, यांनी जस्तगाव येथे ढगफुटी व अतिवृष्टी झालेल्या शेतीच्या नुकसानीचे सर्वे बांधावर न जाता सर्वे करण्यात आले त्यामुळे जस्तगाव येथील बऱ्याचशा शेतकऱ्यांना अतिवृष्टी सर्वे पासून वंचित ठेवले.
त्यामुळे पिकांचे झालेले नुकसानीचे वस्तुनिष्ठ सर्वे पुन्हा करून आमचे सर्वे यादीमध्ये नावे समाविष्ट करावे व याची चौकशी करून सर्वे करणाऱ्या कामचुकार अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व अतिवृष्टी सर्वे पासून वंचित ठेवण्यात आलेल्या शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा लोकशाही मार्गाने तहसील कार्यालयासमोर 30 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करू असा इशारा तहसीलदार संग्रामपूर यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. सदर दिलेल्या निवेदनावर कैलास पुंडे, अमोल शिंगोटे, मधुकर डोसे, सुरज डोसे, उषाताई राजेंद्र डोसे, ताई बाई दही, शारदा डोसे, गजानन डोसे तसेच इतर 50 ते 60 शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या या निवेदनावर आहेत.