आशाताई बच्छाव
सागरी सीमा मंच आयोजित सागर किनारे स्वच्छता अभियान सर्वांच्या सहभागातून यशस्वी करूया- जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील
रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात स्वच्छ सागर तट अभियानाचे 17 सप्टेंबरला रत्नागिरी आयोजन करण्यात येत असून सागरी सीमा मंच माध्यमातून जिल्हा प्रशासन, सर्व विभाग यांच्या सहयोगातून आणि नागरिकांच्या सहभागातून हे अभियान यशस्वी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह येथे आज जिल्हाधकारी डॉ. बी.एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सागरी किनारे स्वच्छता अभियान नियोजनांसदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शुभांगी साठे, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.), तहसीलदार तेजस्वीनी पाटील, आदि संबधित विभागाचे अधिकारी तसेच सीमा जागरण मंचाचे (दिल्ली) अखिल भारतीय सहसंयोजक मुरलीधर भिंडा, सागरी सीमा मंच प्रांत संयोजक संतोष पावरी, अमर पावशे, स्वप्नील सावंत ,डॉ. प्रशांत अंडगे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी डॉ. बी.एन. पाटील यांनी अभियाना अनुषंगाने सर्व विभागांना सूचना दिल्या. या अभियानात रत्नागिरी जिल्ह्याचे योगदान भरीव असावे, कोणतीही अडचण असल्यास त्वरित संपर्क साधावा, असे सांगितले.
दक्षिण रत्नागिरी जिल्हा कार्यक्रम जयगड ते जैतापूर (माडबन) पर्यंत होणार आहे. यामध्ये 1) नांदीवडे बीच 2) मालगुंड बीच 3) गणपतीपुळे बीच (3मोठे कार्यक्रम),4) आरे बीच 5) काळबादेवी बीच6) मिर्या बीच7) पांढरा समुद्र 8) मांडवी बीच (मोठा कार्यक्रम) 9) भाट्ये बीच (मोठा कार्यक्रम)10) कसोप बीच 11) कुर्ली बीच 12) वायंगणी बीच13) रनपार बीच14) गणेशगुळे बीच15) पूर्णगड बीच16) गावखडी बीच17) वेत्ये बीच 18) अंबोळगड बीच19) जैतापुर बीच20) साखरी नाट्ये येथे स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे.
उत्तर रत्नागिरी जिल्ह्यात 1) वेसवी, 2) बाणकोट, 3)उंबरशेत, 4) उटंबर, 5) आडे, 6) लखडतर 7) हर्णे-पाज, 8) लाडघर,9) लखडतर वाडी, 10) बुरोंडी, 11) दाभोळ, 12) तरीबंदर, 13) वेलदुर, 14) असगोली, 15) पालशेत, 16) बुधल, 17) बोर्या, 19) कोंडकारूळ, 20) वेळणेश्वर, 21) साखरी आगर, 22) हेदवतड, 23) काताळे नवानगर 24) कुडली येथे होणार आहे.