आशाताई बच्छाव
उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाने संग्रामपूर तालुक्यातील 42(ड) भूखंड रद्द करण्याचा आदेश!
ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)
संग्रामपूर तालुक्यात भूमाफिया चांगले सक्रिय असून तालुक्यातील काही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्व नियम धाब्यावर ठेवून अनधिकृतपणे केलेले 42 (ड) भूखंड रद्द करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांनी दिले असून, त्यामुळे संग्रामपूर तालुक्यातील भू माफीयात एकच खडबड उडाली असल्याचे पहावयास मिळत आहे. संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांत शेंकडों एकर जमीन भू माफिया व संबंधित अधिकाऱ्यांनी हात मिळवणी करून सर्व नियम धाब्यावर ठेवून आकृषक करून 42 ड चे ले आऊट पाडण्यासाठी अधीकारी व काही भु माफीया सक्रीय आहेत या गैरप्रकारांची चैकशी करून दोशी अधिकाऱ्यांवर नीलंबनाची कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील ग्राम चागेफळ येथील समाधान दहीभात यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कडे केली आहे. पण आता असे भुखंड रद्द करण्याचे काम उपवीभागीय अधिकारी जळगाव जा करीत आहेत . परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनधिकृत पणे केलेले 42 रद्द करण्यासोबतच असे चुकीचे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुद्धा करावी अशी मागणी समाधान दहिभात यांच्याकडून होत आहे.
संग्रामपूर तालुक्यातील भूखंड माफिया तलाठी मंडळ अधिकारी प्रभारी ना तहसीलदार यांनी संगत मत करून शासनाची दिशाभूल करत 42 ड चे आदेश काढुन जमीनीवर अकृषक ले आऊट पाडले यात मोठा अर्थ पूर्ण व्यवहार झाल्याचे बोलल्या जात आहे सामान्य नागरिकांची फसवणूक झाल्याचे समजते तरी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे कडे तक्रार करूनही हे प्रकार असेच चालू राहणार की दोशीवर कारवाई होणार की..? याकडे तालुका वाशीयांचे लक्ष लागले आहे.