Home औरंगाबाद अग्निवीर तरुण रात्रभर रस्त्यावरच थांबले?

अग्निवीर तरुण रात्रभर रस्त्यावरच थांबले?

73
0

आशाताई बच्छाव

IMG-20220818-WA0045.jpg

पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: अग्निवीर तरुण रात्रभर रस्त्यावरच थांबले? संभाजीनगर मध्ये अग्नीवर तरुणांची भरती चालू असताना त्या ठिकाणी आलेले सर्व तरुण भरतीसाठी रात्रभर रस्त्यावर थांबावे लागले. त्यांना त्या ठिकाणी कुठलीही सुविधा मिळाली नाही .त्या अग्निवीरांना ना खायला ,ना प्यायला पाणी अशा अवस्थेत त्यांनी ती रात्र कशी काढली त्यांनाच माहिती. त्यामुळे सरकारला एकच सांगणे आहे की देशाच्या संरक्षणासाठी अग्नि विराणी आपले जीवदान देण्यासाठी या ठिकाणी भरतीसाठी आले आहेत. भरतीपूर्वी त्यांच्या काळजीसाठी त्यांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना अन्न व पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावेत. अग्निवीरांना सरकारी राहण्याची सोय मिळावी अशा प्रकारच्या सुविधा मिळाल्याने अग्निवीरांना देशाचे भवितव्यासाठी जे कस लावावे लागतात ते सहज लावू शकतात. अग्निवरांचा एकच म्हणणे आहे की यापुढे अग्नीवर भरतीसाठी आलेल्या सर्व तरुणांचं राहणे ,खाणे व झोपण्याची सोय व्हावी कारण दुसऱ्या दिवशी त्यांना शारीरिक परिश्रम करून भरतीसाठी सामोरे जावे लागते .त्यासाठी अंगामध्ये ताकद असावे लागते म्हणून या सर्व गोष्टी प्रशासनाने आम्हाला द्याव्यात अशी त्यांना विनंती आहे.

Previous articleनांदगांव शहरातील गांधी चौक येथे वर्मा जेवल्स चे संचालक, नंदलाल वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
Next articleप्रत्येक तरूण आत्मनिर्भर झाला तर भारत आत्मनिर्भर होईल- कौस्तुभ फाटक
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here