आशाताई बच्छाव
पुणे, हवेली तालुका प्रतिनिधी श्री संजय वाघमारे: अग्निवीर तरुण रात्रभर रस्त्यावरच थांबले? संभाजीनगर मध्ये अग्नीवर तरुणांची भरती चालू असताना त्या ठिकाणी आलेले सर्व तरुण भरतीसाठी रात्रभर रस्त्यावर थांबावे लागले. त्यांना त्या ठिकाणी कुठलीही सुविधा मिळाली नाही .त्या अग्निवीरांना ना खायला ,ना प्यायला पाणी अशा अवस्थेत त्यांनी ती रात्र कशी काढली त्यांनाच माहिती. त्यामुळे सरकारला एकच सांगणे आहे की देशाच्या संरक्षणासाठी अग्नि विराणी आपले जीवदान देण्यासाठी या ठिकाणी भरतीसाठी आले आहेत. भरतीपूर्वी त्यांच्या काळजीसाठी त्यांचे हाल होऊ नये यासाठी त्यांना अन्न व पाणी मिळावे यासाठी प्रयत्न करावेत. अग्निवीरांना सरकारी राहण्याची सोय मिळावी अशा प्रकारच्या सुविधा मिळाल्याने अग्निवीरांना देशाचे भवितव्यासाठी जे कस लावावे लागतात ते सहज लावू शकतात. अग्निवरांचा एकच म्हणणे आहे की यापुढे अग्नीवर भरतीसाठी आलेल्या सर्व तरुणांचं राहणे ,खाणे व झोपण्याची सोय व्हावी कारण दुसऱ्या दिवशी त्यांना शारीरिक परिश्रम करून भरतीसाठी सामोरे जावे लागते .त्यासाठी अंगामध्ये ताकद असावे लागते म्हणून या सर्व गोष्टी प्रशासनाने आम्हाला द्याव्यात अशी त्यांना विनंती आहे.