आशाताई बच्छाव
वानखेड येथे ग्रामपंचायत कार्यालय आठवडी बाजाराच्या दिवशी सामूहिक राष्ट्र गायन संपन्न
युवा मराठा न्यूज वेब पोर्टल प्रतिनिधी रवी शिरस्कार संग्रामपूर
यंदा आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळून तब्बल 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. यानिमित्तानं देशात ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’ सुरु आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात राज्यात 17 ऑगेस्ट रोजी या महोत्सवाअंतर्गतच, सामूहिक राष्ट्रगीत गायन ही संकल्पना राबवण्यात आलेली आहे.
राज्यातील सर्व जनतेने बुधवारी सकाळी 11 वाजता सामूहिक राष्ट्रगीत गायनात सहभागी व्हावे, असं आवाहन करण्यात आले होते.
‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने जिल्हा प्रशासनाने सामूहिक राष्ट्रगायनाचा हा अनोखा कार्यक्रम राबविला आहे.या समूह गायनामध्ये राज्यातील सर्व अबाल-वृद्धांनी सुद्धा या उपक्रमात सहभागी होऊन एक नवा विक्रम स्थापित करावा असे राज्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सुचविले आहे.
आज संग्रामपूर तालुक्यातील वानखेड येथे ग्रामपंचायत वतीने दि.17 ऑगेस्ट रोज बुधवार येथे सकाळपासून या सामूहिक राष्ट्रगायनाचे नियोजन केले होते.
बुधवार रोजी वानखेड येथे आठवडी बाजार भरत असतो त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात भरपूर गर्दी असते त्यामुळे या सामूहिक गायनामध्ये गावातील असंख्य नागरिकांनी सुद्धा सहभाग दर्शविला होता. तसेच या अमृत मोहोत्सवात ग्रापंचायत मधील कर्मचारी यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्र गायनानंतर सर्वांना चहापाण्याची व्यवस्था करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली..
यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य,लिपिक,पाणीपुरवठा कर्मचारी, गावातील आशा सेविका,अंगणवाडी मदतनीस तसेच गावातील प्रतिष्टित नागरिक आदींचा समावेश होता.