Home बुलढाणा वरवट बकाल ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून आजी-माजी सैनिकांचा सत्कार

वरवट बकाल ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून आजी-माजी सैनिकांचा सत्कार

108
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0016.jpg

वरवट बकाल ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून आजी-माजी सैनिकांचा सत्कार
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
रवि शिरस्कार ,संग्रामपूर
या वर्षीच्या 15 ऑगस्ट 2022 च्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाची तयारी ऑगेस्ट महिन्याच्या सुरवातीपासून संपूर्ण भारतभर सुरू आहे. या मध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळुन तब्बल 75 वर्षे पूर्ण झाली.या देशाला अजरामर करण्यासाठी कित्तेक विरांनी आपल्या प्रणाच्या आहुत्या दिल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळुन दिले. या क्षणाला स्मरण करुन त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताच्या लढ्याची आठवण करून आज दि.15 ऑगेस्ट रोजी ग्रामपंचायत वरवट बकाल कडून सरपंच सौ.इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले असुन गावातील सैनिक विजय टाकळकर,जानकीराम दातार,श्रीकृष्ण दातार या सैनिकांचा सत्कार केला आहे

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.प्रतिभा इंगळे होते तसेच कार्यक्रमात,ग्राम विकास अधिकारी बोडखे,उपसरपंच सौ.नंदा रौंदळे ग्रामपंचायत सदस्या-संगीता इंगळे,कमल ढगे,रेणुका दामधर,मंगला ससाने,प्रभा डाबरे,रूपाली इंगळे,मीना ईधोकार,रेणुका पवार हजर असुन ग्रामपंचायत सदस्य- सतीश टाकळकर,अजय बकाल,संतोष टाकळकर हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश टाकळकर यांनी केले
कार्यक्रमात सरपंच प्रतिभा इंगळे,श्याम डाबरे तसेच सैनिक श्रीकृष्ण दातार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रल्हाद दातार यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल इंगळे यांनी केले तसेच कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मान्यवर महिला, पुरुष, युवक, उपस्थित होते.

Previous articleनंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात.             
Next articleआयडियल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here