आशाताई बच्छाव
वरवट बकाल ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण करून आजी-माजी सैनिकांचा सत्कार
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
रवि शिरस्कार ,संग्रामपूर
या वर्षीच्या 15 ऑगस्ट 2022 च्या स्वातंत्र्याच्या अमृत मोहत्सवाची तयारी ऑगेस्ट महिन्याच्या सुरवातीपासून संपूर्ण भारतभर सुरू आहे. या मध्ये निरनिराळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळुन तब्बल 75 वर्षे पूर्ण झाली.या देशाला अजरामर करण्यासाठी कित्तेक विरांनी आपल्या प्रणाच्या आहुत्या दिल्या आणि देशाला स्वातंत्र्य मिळुन दिले. या क्षणाला स्मरण करुन त्याचप्रमाणे स्वतंत्र भारताच्या लढ्याची आठवण करून आज दि.15 ऑगेस्ट रोजी ग्रामपंचायत वरवट बकाल कडून सरपंच सौ.इंगळे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले असुन गावातील सैनिक विजय टाकळकर,जानकीराम दातार,श्रीकृष्ण दातार या सैनिकांचा सत्कार केला आहे
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.प्रतिभा इंगळे होते तसेच कार्यक्रमात,ग्राम विकास अधिकारी बोडखे,उपसरपंच सौ.नंदा रौंदळे ग्रामपंचायत सदस्या-संगीता इंगळे,कमल ढगे,रेणुका दामधर,मंगला ससाने,प्रभा डाबरे,रूपाली इंगळे,मीना ईधोकार,रेणुका पवार हजर असुन ग्रामपंचायत सदस्य- सतीश टाकळकर,अजय बकाल,संतोष टाकळकर हे होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश टाकळकर यांनी केले
कार्यक्रमात सरपंच प्रतिभा इंगळे,श्याम डाबरे तसेच सैनिक श्रीकृष्ण दातार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. संचालन प्रल्हाद दातार यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल इंगळे यांनी केले तसेच कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मान्यवर महिला, पुरुष, युवक, उपस्थित होते.