आशाताई बच्छाव
नंदुरबार जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात. जिल्हा ब्युरो चीफ :- सागर (गणेश) कांदळकर गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी संकटात आत्ता परिसरातील मिरची ,पपई , मूग, कपाशी पिकांची झाडे अती पावसाने पिवळी पडून कोमजत आहे. तर येथे मिरची पिकांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणतात ना कोणती ही गोष्ट ही गरजेपेक्षा अधिक मिळाली की ती नुकसान करून जाते तसा प्रकार होत आहे….
पावसाने दडी दिल्या नंतर पाऊस कधी पडेल म्हणून चिंतेत असलेला बळीराजा सततच्या पावसाने संकटात सापडला आहे. सततच्या पावसाने पिके बसण्यास सुरवात झाली असून यात मिरची, कपाशी पिकांची झाडे पिवळी पडत आहे.
तर नंदुरबार , शाहदा परिसरात मिरची ,सोयाबीन,कपाशी पिकांना अक्षरशः पीक सोडून देण्याची वेळ आली यावर्षी चांगल्या प्रमाणात असून उत्पन्न ही चांगले होईल अशी आशा आहे, मात्र पावसाने विश्रांती घेतली नाही तर हातात येणारे पीक डोळ्यासमोर नुकसान होईल हे तितकेच खरें.
कृषी विभागाने (Krushi Department) परिसरातील पीक पाहणी करावी, झालेल्या नुकसानी बाबत शासन दरबारी माहिती कळवावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
सततच्या सुरू असलेल्या पावसामुळे मिरची, पपई ,सोयाबीन,कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
कपाशी पिकाची झाडे पिवळी पडली असून अतिरिक्त फवारणी करून ही झाड वाचेल की नाही सांगता येत नाही.