Home परभणी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक देशभावनेचा उर्जादायी सोहळा”

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक देशभावनेचा उर्जादायी सोहळा”

395

आशाताई बच्छाव

IMG-20220815-WA0134.jpg

“स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक देशभावनेचा उर्जादायी सोहळा”

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कावी येथे शाळेचे मुख्याध्यापक आर.जे. भताने यांच्या मार्गदर्शनातून विद्यालयात ध्वजारोहण तसेच प्रभातफेरी संपन्न झाली. प्रथमतः शाळेतुन प्रभातफेरी काढण्यात आली. यात तिरंगा रंगाची वेशभूषा केलेल्या विद्यार्थिनी, विद्यालयाचे स्काऊट चे पथक, झांज पथक, क्रीडा विभागातील विद्यार्थी व इतर सर्व विद्यार्थी हातात तिरंगा घेऊन आणि आपला राष्ट्राभिमान घोषणांच्या माध्यमातून दाखवत प्रभातफेरीत सहभागी झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.भताने सर उपस्थित होते तर जेष्ठ शिक्षक श्री.एस.डी.सोनवणे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजारोहण संपन्न झाला. यानंतर श्री. एस.एस सकनूर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी देश भक्ती गीत सादर करत उत्सवात चैतन्य निर्माण केले.
यानंतर जेष्ठ शिक्षक श्री.एस.डी.सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना अमृत महोत्सवाची पार्श्वभूमी मांडत मनोगत व्यक्त केले. तर अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक श्री.आर.जे.भताने यांनी विद्यार्थ्यांनी ” हर घर तिरंग” या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला त्याबद्दल विद्यार्थी तसेच पालकांचे विशेष आभार व्यक्त केले. प्रत्येकाने आपल्याघरी ध्वज विसर्जन करतेवेळी राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही अशी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी.मयुरी दत्ता उगले यांनी केले तर आभार श्री ए.पी साठोणे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंद श्री एम.जी.काळे, श्री ए.आर देवकर, श्री यु.एस.मुंढे, श्री एस.टि.ठोंबरे यांनी प्रयत्न केले.
यावेळी शाळेचे शिक्षण समिती अध्यक्ष- श्री सुदाम हराळ, उपाध्यक्ष- श्री प्रल्हाद घुगे तसेच SMC सद्स्य , पदाधिकारी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक उर्जादायी आणि प्रेरणादायी उपक्रम….प्रत्येक भारतीयांच मन अभिमानानं आणि स्वाभिमानानं फुलून जावं तसंच देशभक्ती आणि क्रांतिवीरांच्या स्मरणातून तरुणांची , अबाल वृद्धांची देशभावना देशप्रेम या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवातून दिसून आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव एक अविस्मरणीय असा नयनरम्य सोहळा पार पडला.

Previous articleस्वातंत्र्य दिनानिमित्त शहादा येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन भक्तांकडून उत्साहपूर्ण रक्तदान शिबीर संपन्न
Next articleमहाराष्ट्राततील पहिला पावडर निर्मिती करण्याचा प्रकल्प सटाणा तालुक्यात
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.