आशाताई बच्छाव
75 अमृत मोहत्सवात सहभागी होण्याकरिता दुर्गादैत्य ग्रामपंचात तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रभात फेरी काढुन गावकाऱ्यांचा उत्साह वाढवला
युवा मराठा न्युज वेब पोर्टल
रवि शिरस्कार,संग्रामपूर
भारत सरकारने यंदाच्या 75 व्या स्वातंत्र्यदिनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी 2 ऑगेस्ट पासुन वेगवगेळ्या कार्यक्रमांचं आयोजन केले आहे.
सर्व देशवासियांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने ही मोहीम सुरू केली आहे. ‘हर घर तिरंगा’ म्हणजे राष्ट्रध्वजाशी देशवासीयांचे वैयक्तिक तसेचऔपचारिक नाते आहे आणि हेच नाते त्यांच्या मनामध्ये प्रस्थापित करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. देशभक्ती आणि भावनिक संबंध देशासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली असुन जिथे 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व भारतीयांना राष्ट्रध्वज फडकवण्याची संधी दिली जात आहे
याशिवाय देशातील अनेक शैक्षिणक संस्थांनी ‘हर घर तिरंगा’ प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा आणि इतर स्पर्धांचं आयोजन केले असुन ज्या माध्यमातून मुलांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल.असे अनेक प्रयत्न केले आहेत दि 09ऑगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य येथील जिल्हापरिषद मुलांची शाळेतील मुलांची पुर्ण गावातून फेरी काढून हर घर तिरंगा नारे देऊन गावातील सर्व लोकांना आपल्या घरी तिरंगा फडकुन या मोहिमेत सहभागी होण्याकरिता उत्साहित केले
यावेळी गावातील प्रथम नागरिक सरपंच- अमर तायडे, ग्रामसेवक- दिपाली माहुलकर, शाळा समिती अध्यक्ष- पंजाब वानखडे, ग्रामपंचायत सदस्य -संगीता अंभोरे, भाऊराव कातव, शिक्षक- आसोले
तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा मोठ्या संख्येत सहभाग होता.