आशाताई बच्छाव
आजादी का अमृत महोत्सव निमित्ताने मुक्रमाबाद शहरात स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने
भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली
मुक्रमाबाद प्रतिनिधी बस्वराज स्वामी वंटगिरे
ब्युरो चिफ (युवा मराठा
न्युज नेटवर्क मुक्रमाबाद)
भारताचा 75 वा स्वातंत्र्य दिन म्हणजेच अमृत महोत्सव स्वातंत्र्य वर्ष साजरा करताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून अनेक नवनवीन सांस्कृतिक व राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या अमृत महोत्सवी कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून राष्ट्रीय सेवा योजना विभाग, क्रीडा विभाग व सांस्कृतिक विभागाच्या वतीने
आज शुक्रवार १२ ऑगस्ट आठवडी बाजार यादिवशी भव्य तिरंगा रॅली महाविद्यालयाचे सचिव शिक्षण महर्षी व्यंकटरावजी पाटील गोरेगावकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली हि रॅली काढण्यात आले.ही रॅली महाविद्यालयातुन काॅलेज रोड,मेन बसस्टाॅफ, मार्केट लाईन, गणपती मंदिर भवानी चौक ते महाविद्यालय येथे विराजमान झाले.या रॅलीत विद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनी सहभाग झाले होते प्रत्येकाच्या हातात तिरंगा झेंडा घेऊन हर घर तिरंगा घर घर तिरंगा भारत माता की जय वंदे मातरम असे जयघोष करत नागरिकांना आव्हान करण्यात आले.या रॅलीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ईनामदार,प्राध्यापक ढोकाडे आर.एस. डॉ मा.म. गायकवाड प्रा. बाळबुध्वे बी
डब्ल्यू. डॉ.बी.पी खराबे ,प्रा. शिंदे ए.व्ही., डॉ. सकनूरे एस.एल., डॉ. मादळे आर.बी, डॉ.काळे जे.पी.डॉ. बाविस्कर आर.बी. डॉ.शेख जी.जी. डॉ.सय्यद एम.एम.डॉ पवार व्ही. बी. डाॅ पांचाळ सर . संतोष पाटील,मुळे सर व सर्व कर्मचारी उपस्थित होते.