Home मुंबई मंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क

मंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क

127
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0029.jpg

मंत्री लोढा आणि राज ठाकरें भेटीने तर्कवितर्क            मुंबई,( ब्युरो टिम युवा मराठा न्युज नेटवर्क)

आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मुंबई भाजपा अध्यक्षपदाची जबाबदारी असणारे मंगलप्रभात लोढा यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले आहे. मंत्रिपदाच्या शपथविधीला २४ तास उलटत नाहीत तोवर मंगलप्रभात लोढा यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली.

या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडच्या काळात राज ठाकरेंची भाजपा नेत्यांसोबत जवळीक वाढली असून मनसे-भाजपा एकत्र येण्याच्याही चर्चा आहेत.

काही दिवसांपूर्वीचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थ निवासस्थानी जात राज ठाकरेंची भेट घेतली होती. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये २ तास चर्चा झाली होती. राज्यात शिंदे गट शिवसेनेतून फुटून वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. खरी शिवसेना आमचीच आहे असा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. विधानसभेत दोन तृतीयांश बहुमत आमच्याकडे आहे. आम्ही पक्षातून बाहेर पडलो नाही तर शिवसेना आमचीच आहे आम्ही फक्त नेता बदलला आहे असं शिंदे गटातील आमदार सांगत आहेत. शिंदे गटाच्या या दाव्याबाबत अद्याप कायदेशीर लढाई कोर्टात सुरू आहे. शिंदे गटाला इतर पक्षात विलीन व्हावेच लागेल असं सांगण्यात येते. त्यात पर्यायाने मनसेचं नाव पुढे येते. त्यात शिंदे-फडणवीस सरकारला मनसेनं सभागृहात मतदान केले आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर आता मंगलप्रभात लोढा यांच्या राज भेटीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Previous articleजयगड-उंडी फाट्यावर झालेल्या दुचाकी व स्कूलबसमध्ये झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू
Next articleस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवासाठीचे “हेरिटेज वॉक” ठरले लक्षवेधक
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here