Home परभणी येलदरी, सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

येलदरी, सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

112

आशाताई बच्छाव

IMG-20220809-WA0004.jpg

येलदरी, सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

परभणी:- येलदरी व सिध्देश्वर
धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने
धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. सोमवार ८ ऑगस्ट रोजी येलदरी धरणात ७४४.०११ दलघमी तर सिध्देश्वर धरणात २४१.४७८ दलघमी पाणीसाठा आहे. एकुण पाणी साठवणुक
क्षमतेच्या येलदरी ७६.४८ तर सिध्देश्वर ८८.४२ टक्के भरले आहे. यामुळे येत्या काळात कोणत्याही क्षणी दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे येलदरी व सिध्देश्वर धरणे या पावसाळ्यात शंभर टक्के क्षमतेने भरतील. सोमवार ८ ऑगस्ट पर्यंत धरणांमध्ये ७० टक्यांच्या वर पाणी साठा जमा झाला असून येत्या काळात पाण्याची आवक लक्षात घेता पूर्णा
पाटबंधारे विभाग पाण्याचा वेळोवेळी विसर्ग करत आहे. याच अनुषंगाने सोमवारी पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हाप्रशासनाला संभाव्य पाण्याच्या विसर्गासंदर्भात कळवण्यात आले आहे. येलदरी व सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा द्यावा असे पूर नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालये यांना कळविले आहे. नागरीकांनी नदीपात्रात उतरूनये, जनावरे नदीत सोडु नयेत किंवा कोणतीही जीवीत हानी अथवा वित्त हानी होणार नाही यासंदर्भात काळजी घ्यावी असे अवाहन कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग, वसमत नगर यांनी केले आहे.

Previous articleनांदेडच्या विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Next articleदेवळा तालुक्यात आमदार डाँ.राहुल आहेरांच्या हस्ते ध्वजांचे वाटप
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.