आशाताई बच्छाव
वानखेड मध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे सुरु
युवा मराठा नयुज वेब पोर्टल प्रतिनिधी:- रवि शिरस्कार संग्रामपूर
दिनांक १७ आणि १८ जुलै पासुन सुरु झालेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले आहे अनेक शेतकऱ्यांची जमीन पाण्याखाली गेल्यामुळे पिके नष्ट झाली आहे संततधार झालेल्या या जोरदार पावसामुळे मुळे वानखेड तसेच पातुर्डा परिसरात अतिवृष्टी सारख्या पावसामुळे वान नदीला पूर व नाल्याच्या काठावरील शेतजमीन खरडून गेली व काही समतोल जमिनीत पाऊसाच पाणी थांबले त्यामुळे काही शेतकऱ्यांचे पिकांचे काही प्रमाणात तर काही लोकांच बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले
वानखेड येथील श्रीमती शांताबाई मोहन बंड यांच्या गट क्रं 918 या नदीकाठच्या एकूण 1 हेक्टर 70 आर या क्षेत्रातील तब्बल 40 आर शेती खरडुन चक्क नदीमद्धे सामावली आहे,त्याचप्रमाणे सुरेश सांगळे 40आर,पंढरी सांगळे12आर,गजानन बंड23आर,विश्वनाथ सांगळे20आर यांच्या वाहून गेलेल्या शेतीचे दिनांक 29 जुलै ला पंचनामा केला आहे
तसेच मा.तहसीलदार साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार वानखेड येथील इतर शेतकऱ्याच्या शेतीचे पंचनामे करून महसुल विभागात दाखल करण्यात आले आहे
यामध्ये वानखेड येथील ग्रामसेवक, गाव तलाठी, संग्रामपुर कृषी सहायक यांनी संयुक्त पंचनामे सादर केले आहेत.
तरी नुकसान झालेल्या, या काही शेतकऱ्यांना प्रशासनाकडून काय मदत होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






