आशाताई बच्छाव
पुणे,हवेली तालुका प्रतिनिधी संजय वाघमारे: इराण मध्ये जोरदार पावसाचा फटका; इराण या देशांमध्ये 29 वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर खूप जोरदार पावसाला सुरुवात झाली गेल्या तीन दिवसापासून पावसाने एवढा भयंकर उद्रेक घातला आहे की त्यामध्ये घर गाड्या रस्त्यावरील वाहने सगळे वाहून जाताना दिसत आहेत पुराचा एवढा प्रचंड लोंडा आहे की त्या वेगामध्ये नागरिक वाहताना दिसतात. आतापर्यंत १०० नागरिकांचा मृत्यू झाला असे इराणी जाहीर केले आहे. काही नागरिक बेपत्ता सुद्धा आहेत. तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेले आहे अशा परिस्थितीमध्ये जगाव कसं याचा प्रश्न इराण नागरिकांना पडला आहे पावसाचा वेग दिवसान दिवस वाढत चाललेला आहे पूर परिस्थिती निर्माण झाली आहे रस्ते, नदी,नाले सर्व काही ओसंडून वाहत आहे. इराणी नागरिकांचं हे हाल फार दळणे आहेत आता त्यांना खाणे,पिणे व राहणे या तीनही समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय करावं हा एक प्रश्न त्यांच्यासमोर उभा मांडला आहे. इराण या देशाचं या पावसामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेला आहे.