Home नांदेड वळग सोसायटी चेअरमन पदी नरसिंगराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण अंकलवार...

वळग सोसायटी चेअरमन पदी नरसिंगराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण अंकलवार यांची एकमताने निवड.

90
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0040.jpg

वळग सोसायटी चेअरमन पदी नरसिंगराव पाटील तर व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण अंकलवार यांची एकमताने निवड.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलूर तालुक्यातील वळग सेवा सहकारी सोसायटी च्या चेअरमन पदी नरसिंग राव उर्फ तुकाराम पंढरीनाथ राव पाटील व व्हाईस चेअरमन पदी लक्ष्मण ईरप्‍पा अंकलवार यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून वळग सेवा सहकारी सोसायटी सचिव शैलेश पाटील यांनी काम पाहिले. सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत. निवडणूक निर्वाचन अधिकार्‍यांकडे चेअरमन पदासाठी व्हाईस चेअरमन पदासाठी एक एकच अर्ज आल्यामुळे चेअरमन व व्हाईस चेअरमन ची बिनविरोध एकमताने निवड करण्यात आली. तसे निवडीचे पत्र निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्याने सर्वांच्या उपस्थितीत दिले.
यावेळी सेवा सहकारी सोसायटीचे सर्व सदस्य उपस्थित होते व तसेच उपसरपंच माधव मोरे, सरपंच प्रतिनिधी नागनाथ गज्जलवार, तुकाराम पाटील, दादाराव मोरे, व्यंकट मोरे गुरुजी, वामनराव बुक्कावार, रावसाहेब मोरे, तेजराव कावटवाड, लक्ष्मण कावटवाड,शिवाजी पाटील, बाळू पाटील, चंद्रकांत मोरे, व्यंकटराव पोलीस पाटील, विठ्ठल राव पाटील, नागनाथ पवार, पत्रकार चंद्रकांत गज्जलवार ,शंकर बुके वाड, पोच्चना आचेमवार, यादव बुके वाड, गंगाबाई बुक्की वाड,आदि उपस्थित होते. सर्वांनी या निवडीबद्दल समाधान व्यक्त करून चेअरमन व व्हाईस चेअरमन चे अभिनंदन केले. सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Previous articleअनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीच्या नवीन पत्त्यावर संपर्क करण्याचे आवाहन
Next articleकृषि दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here