Home बुलढाणा पिक कर्ज वाटपासाठी स्वाभिमानीची बँकेवर धडक आंदोलन

पिक कर्ज वाटपासाठी स्वाभिमानीची बँकेवर धडक आंदोलन

26
0

आशाताई बच्छाव

IMG-20220629-WA0006.jpg

पिक कर्ज वाटपासाठी स्वाभिमानीची बँकेवर धडक आंदोलन

युवा मराठा न्यूज व वेब पोर्टल, रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर शहर प्रतिनिधी

संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरणी आटोपत आल्या असून सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप थंडबस्त्यात करीत असल्याने आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देऊन आक्रमक आंदोलन केले आहे. बँक व्यवस्थापकांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरत प्रचंड घोषणाबाजी करत सर्व परीसर दणानुन सोडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकऱ्यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा, पिक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यान कडुन कमीशन घेणे बंद करा, मुजोर बँक व्यवस्थापकांचे करायचे काय खाली मुंडक वरती पाय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीसुद्धा आंदोलनाची तिव्रता वाढत असल्याचे पाहुन व्यवस्थापक यांनी नरमाईची भुमिका घेत शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत बँक व्यवस्थापक यांनी आंदोलकांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले असल्याने आंदोलन स्तुर्त स्थगित करण्यात आले. यावेळी आंदोलनामधे स्वाभिमानी पक्षाचे ता. अध्यक्ष विजय ठाकरे, तालुका अध्यक्ष उज्वल पाटील,पक्ष अध्यक्ष आशिष सावळे,राजेश उमाळे, योगेश मुरुख,कलिमोद्दीन काझी, विठ्ठल ताथोड,गोपाल चोपडे, धनंजय कोरडे, गोकुळ गावंडे, अनूप देशमुख, प्रफुल करांगळे, गोलु पाटील, रामकृष्ण गावंडे, विष्णू चितोडे, यांच्या सह बहुसंख्य स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते

Previous articleविद्यार्थी पटसंख्या अभावी बहुतांशी जिल्हा परिषद शाळा बंद होण्याच्या मार्गावर.
Next articleपालघर पोलिसांना यश ७ दरोड्यातील आरोपी जेरबंद.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here