आशाताई बच्छाव
पिक कर्ज वाटपासाठी स्वाभिमानीची बँकेवर धडक आंदोलन
युवा मराठा न्यूज व वेब पोर्टल, रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर शहर प्रतिनिधी
संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पेरणी आटोपत आल्या असून सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक यांनी जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप थंडबस्त्यात करीत असल्याने आज स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बँकेवर धडक देऊन आक्रमक आंदोलन केले आहे. बँक व्यवस्थापकांना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी चांगलेच धारेवर धरत प्रचंड घोषणाबाजी करत सर्व परीसर दणानुन सोडला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो, शेतकऱ्यांना सुरळीत पिक कर्ज वाटप करा, पिक कर्ज वाटपासाठी शेतकऱ्यान कडुन कमीशन घेणे बंद करा, मुजोर बँक व्यवस्थापकांचे करायचे काय खाली मुंडक वरती पाय अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीसुद्धा आंदोलनाची तिव्रता वाढत असल्याचे पाहुन व्यवस्थापक यांनी नरमाईची भुमिका घेत शेतकऱ्यांना तत्काळ पिक कर्ज वाटप करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत बँक व्यवस्थापक यांनी आंदोलकांना लेखी स्वरूपात आश्वासन दिले असल्याने आंदोलन स्तुर्त स्थगित करण्यात आले. यावेळी आंदोलनामधे स्वाभिमानी पक्षाचे ता. अध्यक्ष विजय ठाकरे, तालुका अध्यक्ष उज्वल पाटील,पक्ष अध्यक्ष आशिष सावळे,राजेश उमाळे, योगेश मुरुख,कलिमोद्दीन काझी, विठ्ठल ताथोड,गोपाल चोपडे, धनंजय कोरडे, गोकुळ गावंडे, अनूप देशमुख, प्रफुल करांगळे, गोलु पाटील, रामकृष्ण गावंडे, विष्णू चितोडे, यांच्या सह बहुसंख्य स्वाभिमानीचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते