आशाताई बच्छाव
आसेगाव येथील पाणी पुरवठा बंद
शत्रुघ्न काकडे पाटील :-ब्युरो चिफ ( युवा मराठा न्युज नेटवर्क)
जिंतूर तालुक्यातील आसेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा मागील चार ते पाच दिवसापासून बंद झाला आहे. महावितरणने वीज थकबाकीमुळे या पाणीपुरवठा योजनेच्या रोहित्राचा विद्युत पुरवठा खंडित केला आहे.
ऐन पावसाळ्यात निर्जळीला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. ज्यांची घरी बोअरवेल आहे, त्यांना याची अडचण नाही. मात्र सामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी ग्रामपंचायत कार्यालयाने याकडे लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.