राजेंद्र पाटील राऊत
महावितरण चा गलथान कारभार, विजेची तार तुटुन शेतातील शेडवर पडून 9 मुक्या जनावरांचा मृत्यू
अनसिंग ,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क):- जीवाशी खेळ..! विजवाहक तारा लोंबकळताना दिसतात तर विजेचे खांबही पडण्याच्या स्थितीत आहेत. अशातच वीज प्रवाह सुरू असतो. अनसिंग महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे मुक्या जनावरांना प्राण गमवावे लागले. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी शेतकरी शेतात ये-जा करत असतात. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी महावितरण विरोधात संताप व्यक्त केला आहे. अनसिंग महावितरणचा भोंगळ कारभाराचा फटका वीज ग्राहकांनाच नाही तर मुक्या जीवानाही बसतो आहे.किंबहुना महावितरण च्या मुक्या जीवावर बेतत आहेत. मनोज ईश्वरसिंग चव्हाण, किसन ईश्वरसिंग चव्हाण यांच्या शेतात पडलेल्या जिवंत विज तारा त्यांच्या शेतातील शेडवर पडून मुरा जातीच्या 2 म्हशी 2 वघारी व 1 रेडा(हल्या) व 4 बकऱ्या यांचा मृत्यू झाला आहे. महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मुक्या जनावरांना मात्र नाहक जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातात अनेक निष्पाप मुक्या जनावरांना शेतकऱ्यांना आधार असलेल्या म्हशी व गाई किंवा बैल नाहक जीव गमवावा लागत आहे. या वेळी विजवीतरणाचा गलथान कारभाराचा फटका गरीब शेतकऱ्यांना बसत आहे.